शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

बीफ बॅन हत्याप्रकरण - राजकीय पक्ष आपली पोळी भाजत असल्याचा केजरीवालांचा आरोप

By admin | Published: October 03, 2015 3:06 PM

एका मुस्लीमाला बीफ बाळगल्याच्या अफवेवरून जीवे मारण्याची घटना घडली ती माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - उत्तर प्रदेशातल्या दादरी जिल्ह्यातल्या बिसखेडामध्ये एका मुस्लीमाला बीफ बाळगल्याच्या अफवेवरून जीवे मारण्याची घटना घडली ती माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. या घटनेचा राजकीय पक्ष स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून घेत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी भाजपा अथवा सपाचा उल्लेख न करता केला आहे.
मोहम्मद अखलाख यांचा या मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यांनी घरात गोमांस बाळगल्याची अफवा पसरली आणि काही गुंडांनी त्यांच्या घरावर हल्ला करत त्यांना व त्यांच्या मुलाला मारझोड केली, ज्यात अखलाख यांचा अंत झाला.
विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अखलाख यांच्या भेटीच्या वेळी तसेच प्रसारमाध्यमांसमोर मते व्यक्त करत या घटनेला देशव्यापी आयाम मिळवून दिला. ज्या गावात हा प्रकार घडला त्या गावातील लोक मात्र या सगळ्या प्रकाराल इतके त्रस्त झाले आहेत की आज त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना येण्यास अटकाव केला तसेच गावातील लोकांशी बोलून परिस्थिती बिघडवू नका असे सुनावले.
त्याचवेळी केजरीवाल आले असता, परिस्थिती ठीक नसल्याचे सांगत पोलीसांनी जवळपास दोन तास केजरीवालांना गावाबाहेर थांबवून ठेवले.
नंतर केजरीवाल यांनी गावक-यांची व अखलाख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
या घटनेचा ना हिंदूंना लाभ झाला ना मुस्लीमांना, मात्र, मधल्यामध्ये राजकीय पक्ष मात्र आपली पोळी भाजत असल्याची टिप्पणी केजरीवालांनी नंतर केली आहे.