शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Bengal SSC Scam: महाराष्ट्र मुकाबला करू शकला नाही, पण इथं बंगालची शेरनी बसलीय याद राखा; ममता बॅनर्जी भाजपावर बरसल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 19:10 IST

महाराष्ट्र मुकाबला करू शकला नाही आणि आता बंगाल सरकारही पाडण्याचा इरादा बोलून दाखवला जातोय. पण पश्चिम बंगालमध्ये बंगालची शेरनी आहे.

पश्चिम बंगाल-

महाराष्ट्र मुकाबला करू शकला नाही आणि आता बंगाल सरकारही पाडण्याचा इरादा बोलून दाखवला जातोय. पण पश्चिम बंगालमध्ये बंगालची शेरनी आहे. त्यांना या शेरनीचा मुकाबला करावा लागेल जी कुणालाही घाबरत नाही, असा रोखठोक इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाला दिला आहे. ममता बॅनर्जी आज पहिल्यांदाच शिक्षक भरती घोटाळ्यावर सविस्तर बोलल्या आणि आपली भूमिका स्पष्ट केली. 

"मी अन्याय कदापि सहन करणार नाही. सत्याचा विचार केला गेला पाहिजे. खरंच एखादा कुणी दोषी असेल तर त्याला आजीवन कारावासाची शिक्षा द्या. पण ज्या पद्धतीनं एका महिलेच्या घरात पैसे आढळले म्हणून पक्षावर चिखल उडवला जात आहे ते चुकीचं आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करा, पण यातून पक्ष फोडण्याचं कारस्थान केलं तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही. संबंधित महिलेचा पक्षाशी कोणताही संबंध नाही किंवा सरकारशीही संबंध नाही. ज्यापद्धतीनं बलात्कार प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाचा विचार केला जातो. त्याच पद्धतीनं याही प्रकरणात तीन महिन्यांच्या आत दूध का दूध आणि पानी का पानी व्हायला हवं. याबाबत विचार करावा", असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

"संबंध नसलेल्या प्रकरणावरुन जर अपमान करणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की दुखापत झालेली वाघीण आणखी भयंकर असते. २०२१ च्या निवडणुकीत आम्ही दाखवून दिलं आहे आणि आम्हाला जर कुणासमोर झुकण्याची वेळ आली तर आम्ही फक्त राज्यातील जनतेसमोर झुकू. कुणी मीडिया ट्रायल करणार असेल तर लक्षात ठेवा आगीशी खेळू नका. प्रत्युत्तर कसं द्यायचं ते मला चांगलंच माहित आहे", असा आक्रमक पवित्रा ममता बॅनर्जी यांनी घेतला. 

महाराष्ट्रात यशस्वी झालात, पण मी कुणालाच घाबरत नाही"महाराष्ट्र तुमचा मुकाबला करू शकला नाही. बंगाल सरकारपण पाडण्याची भाषा केली जात आहे. पण बंगालमध्ये शेरनी बसली आहे तिचा तुम्हाला मुकाबला करावा लागेल. ही शेरनी कुणालाच घाबरत नाही. ती जर आज काही बोलत नसेल तर ती घाबरलीय असं कुणी समजू नये. नारदा आणि सारदा प्रकरणात अद्याप कोणताही निकाल आलेला नाही. ज्यापद्धतीनं बलात्कार प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होते. त्याचपद्धतीनं याही प्रकरणांची तीन महिन्यांच्या आत सुनावणी झाली पाहिजे", असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस