शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

बेस्ट बेकरी खटला: दोन आरोपींची कोर्टाने केली निर्दोष मुक्तता, भीषण हत्याकांडात १४ जणांचा झाला होता मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 14:29 IST

Best Bakery case: खटल्यातील दोन आरोपी हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल यांची मुंबईतील एका कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.

सन २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलींदरम्यान, बडोद्यातील बेस्ट बेकरी जळीतकांडात १४ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यातील दोन आरोपी हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल यांची मुंबईतील एका कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील सोलंकी आणि गोहिल हे दोन्ही आरोपी फरार आहेत. 

२००२ मध्ये गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसला लावलेल्या आगीत कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगे भडकले होते. त्याचवेळी हिंसक जमावाने बडोदा येथील बेस्ट बेकरीला आग लावली होती. या आगीत १४ जणांचा जळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी बेस्ट बेकरीच्या मालकांची मुलगी जाहिरा शेख हिने २१ जणांविरोधात तक्रार दिली होती.

संतप्त जमावाने बेकरी चालवणाऱ्या शेख कुटुंबासह आत राहत असलेल्या मुस्लिमांना लक्ष्य केलं होतं. मृत्युमुखी पडलेल्या सर्व १४ जणांनी दंगलीदरम्यान बेस्ट बेकरीमध्ये आसरा घेतला होता. बेकरीमध्ये काम करत असलेल्या तीन हिंदू कामगारांचाही मृत्यू झाला होता.

या प्रकरणी २००३ मध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाने सर्व आरोपींनी सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले होते. त्यानंतर गुजरात हायकोर्टानेही हा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर जाहिरा शेख हिने सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा खटला गुजरातबाहेर चालवण्याचे आदेश दिले होते. पुढे हा खटला मुंबईतील स्पेशल कोर्टामध्ये वर्ग करण्यात आला.

या प्रकरणात मुंबईतील कोर्टाने २००६ मध्ये १७ आरोपींपैकी ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर या खटल्याचा निकाल लागेपर्यंत ४ आरोपींचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींच्या वकिलांनी सदर आरोपींना गुजरातमधील फास्ट ट्रॅक कोर्टाने निर्दोश मुक्त केलेलं आहे, असा युक्तिवाद केला होता.  

टॅग्स :Gujarat Riots 2002गुजरात दंगल 2002Courtन्यायालय