शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

India China FaceOff; लेहसोबत आता समुद्रात भारताने दाखवली ताकद; चीनला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 10:06 IST

अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचा युद्ध सराव करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण याठिकाणाहून चिनी समुद्री मार्गाने जात असतात.

ठळक मुद्देलडाखमध्ये चर्चेनंतरही चिनी कुरापती सुरुच असल्याने भारत सतर्क समुद्रात भारतीय नौदलाने युद्धसराव करुन चीनला दिला इशारा चिनी व्यापारी हालचाली असणाऱ्या अंदमान व निकोबार बेटांजवळ नौदलाचा युद्धसराव

नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील तणाव अद्यापही पूर्णपणे संपुष्टात आला नाही. चिनी कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय जवान सज्ज आहेत. दुसरीकडे अरबी समुद्रात ड्रीलच्या माध्यमातून चीनला योग्य संदेश देण्याचं काम भारताने केले आहे. भारतीय नौदलाने अंदमान आणि निकोबार बेटांवर कवायती करुन भारत दडपशाहीला बळी पडणार नाही असा इशाराच चीनला दिला आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचा युद्ध सराव करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण याठिकाणाहून चिनी समुद्री मार्गाने जात असतात. अनेक व्यापारी कार्यवाही येथे केली जाते. चीनसाठी हा सराव दुहेरी हल्ल्यासारखा असू शकतो. कारण यापूर्वी अमेरिकेने दक्षिण चिनी समुद्रात दोन एअरक्राफ्ट लढाऊ विमानांसह सराव करत आहेत. चीनला त्यांना धमकी देण्याशिवाय काहीच करता येत नाही.

या बेटांवर भारतीय नौदल युद्धसराव करत आहे. यात विनाशक, पेट्रोल विमान आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. या सरावाचं नेतृत्व करणारे पूर्वेकडील नौदल कमांडचे प्रमुख रियर एडमिरल संजय वत्सयन म्हणाले की, मल्लकाजवळ असणारी काही युद्धनौकाही यात सामील झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सबमरीन शोधणाऱ्या एअरक्राफ्ट Poseidon 81,ज्यात घातक ब्लॉक मिसाइल लावण्यात आलं आहे. MK 54 लाइटवेज टोरपीडोज यांचाही युद्धसरावत समावेश आहे. यापूर्वी मल्लकामध्ये भारत आणि जपानने मागील महिन्यात सराव केला होता.

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधील तणावपूर्ण परिस्थितीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लेह येथे पोहोचले. त्यांच्यासमवेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे होते. पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर संरक्षणमंत्र्यांचा लेह दौरा आता खूप महत्वाचा मानला जात आहे.  पूर्व लडाखमध्ये ५ मेपासून भारतीय आणि चिनी सैन्याच्या दरम्यान संघर्ष सुरू आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले त्यानंतर हा तणाव वाढला. दरम्यान, कित्येक बैठकानंतर मुत्सद्दी व सैनिकी चर्चेनंतर दोन्ही बाजूंच्या सैन्य ६ जुलैपासून तणावग्रस्त परिसरातून मागे हटण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावAmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीन