शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सावधान! ‘हेपॅटायटीसने राेज ३,५०० जणांचा होतोय मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 05:46 IST

जागतिक आरोग्य संघटना: भारतात २०२२ मध्ये साडेतीन कोटींपेक्षा जास्त प्रकरणे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसर्गामुळे होणाऱ्या अनेक आजारांमध्ये ‘हेपॅटायटीस’ या आजाराचा समावेश होतो. या आजारातूनच काविळसारखा गंभीर आजार होऊ शकतो. २०२२ मध्ये भारतात हेपॅटायटीसची ३.५ कोटींपेक्षा जास्त प्रकरणे होती, जी त्यावर्षी जागतिक स्तरावर एकूण प्रकरणांपैकी ११.६ टक्के होती. आता हे प्रमाण चीनखालोखाल दुसऱ्याच क्रमांकावर आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२४ च्या जागतिक हेपॅटायटीस अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. या रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे यकृताला सूज येणे. दरवर्षी सुमारे १३ लाख लोकांचा मृत्यू या आजाराने होतो, असे अहवालात म्हटले आहे.

आकडेवारी बोलते...nभारतामध्ये २०२२ मध्ये २.९८ कोटी हेपॅटायटीस बी, हेपेटायटीस सी संसर्गाची संख्या ५५ लाख.nभारतात २०२२ मध्ये ९८,३०५ लोक ‘हेपॅटायटीस बी’मुळे मरण पावले, तर २६,२०६ लोक ‘हेपेटायटीस सी’ने मरण पावले.

मृत्युंची संख्या २ लाखांनी वाढलीहेपॅटायटीसमुळे झालेल्या मृत्युंची अंदाजे संख्या २०१९ मध्ये ११ लाखांवरून २०२२ मध्ये १३ लाख झाली. जगभारत हेपॅटायटीस बी आणि सी संसर्गामुळे दररोज ३,५०० लोक मृत्युमुखी पडत आहेत.

देशातील संक्रमित लोकांपैकी केवळ २.४ टक्के लोकांचे वेळेवर निदान.

हिपॅटायटीस कारणे...हेपॅटायटीस बी आणि सी असुरक्षित इंजेक्शन पद्धतींद्वारे आणि दूषित सीरिंज आणि सुया, संक्रमित रक्त आणि रक्त उत्पादने, लैंगिक संक्रमण, संक्रमित आईपासून बाळापर्यंत प्रसार होतो.

निदान होत नाही हेच मोठे कारणहेपॅटायटीस संसर्ग रोखण्यात जागतिक स्तरावर प्रगती होऊनही मृत्यूदर मात्र वाढत आहे. कारण हेपॅटायटीस असलेल्या फारच कमी लोकांचे निदान आणि उपचार वेळेवर केले जातात, असे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस ॲधानोम गेब्रेयसस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाMedicalवैद्यकीय