शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
2
० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?
3
अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा
4
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
5
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
6
"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन?
7
Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री
8
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
9
तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ!
10
PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा
11
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
12
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
13
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
14
Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स
15
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
16
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
17
रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू 
18
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
19
मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत
20
साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन

"...यावरून काँग्रेस आरक्षण संपवणार हे स्पष्ट", राहुल गांधींच्या वक्तव्यावर मायावती संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 1:14 PM

BSP supremo Mayawati : मायावती म्हणाल्या, खरंतर काँग्रेसची सुरुवातीपासूनच आरक्षणविरोधी विचारसरणी आहे.

BSP supremo Mayawati : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन सध्या राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपच्या सर्व नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता बसपा प्रमुख मायावती यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रात दीर्घकाळ सत्तेत असताना काँग्रेस पक्षाच्या सरकारने ओबीसी आरक्षण लागू केले नाही. आता देशात जातीय जनगणना न करणारा हा पक्ष आता सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत आहे. त्यांच्या नाटकाबद्दल जागरुक राहा, जे भविष्यात कधीही जात जनगणना करू शकणार नाहीत, असे मायावती म्हणाल्या.

आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या या नाटकापासून सावध राहा, त्यांनी परदेशात म्हटले आहे की, जेव्हा भारताची स्थिती चांगली असेल तेव्हा आम्ही एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवू. यावरून काँग्रेस वर्षानुवर्षे त्यांचे आरक्षण संपवण्याचे कारस्थान करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मायावती यांनी सांगत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या या जीवघेण्या वक्तव्यापासून या वर्गातील लोकांनी सावध राहावे, कारण हा पक्ष केंद्रात सत्तेवर येताच या विधानाच्या नावाखाली निश्चितपणे त्यांचे आरक्षण संपवेल. संविधान आणि आरक्षण वाचवण्याचे नाटक करणाऱ्या या पक्षाचे भान या लोकांना असलेच पाहिजे, असेही मायावती म्हणाल्या.

पुढे मायावती म्हणाल्या, खरंतर काँग्रेसची सुरुवातीपासूनच आरक्षणविरोधी विचारसरणी आहे. केंद्रातील त्यांच्या सरकारमध्ये त्यांचा आरक्षणाचा कोटा पूर्ण झाला नाही, तेव्हा या पक्षाकडून न्याय न मिळाल्याने बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. लोकांनी सावध राहावे. तसेच, एकंदरीत, जोपर्यंत देशातून जातिवाद पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत भारताची स्थिती तुलनेने चांगली असूनही या वर्गांची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती सुधारणार नाही. त्यामुळे जातीयवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत आरक्षणाची योग्य घटनात्मक व्यवस्था चालू ठेवणे आवश्यक असल्याचे मायावती यांनी सांगितले.

काय म्हणाले राहुल गांधी?दरम्यान, जातिनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागच्या काही दिवसांपासून कमालीचे आक्रमक आहेत. दरम्यान, सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार? या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोठं विधान केलं आहे. जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने समानता असेल, तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल. सध्यातरी अशी स्थिती नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

टॅग्स :mayawatiमायावतीRahul Gandhiराहुल गांधीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेस