शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
3
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
4
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
5
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
6
Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
7
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप?
8
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
9
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
10
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
11
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
12
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
13
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
14
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
15
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
16
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
17
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
18
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
19
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
20
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा

"भारत जोडोचा खरा अजेंडा भारत तोडो आहे...", केंद्रीय मंत्र्यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 3:58 PM

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेस सध्या देशाच्या अनेक राज्यांतून भारत जोडो न्याय यात्रा काढत आहे. हा प्रवास मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईत संपेल. या प्रवासादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी अनेक राज्यांतून जाणार आहेत. या दरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर वारंवार निशाणा साधला आहे. मात्र आता केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "भारत जोडोचा खरा अजेंडा भारत तोडो आहे" असं म्हटलं आहे. 

प्रल्हाद जोशी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "काँग्रेस भारताविरोधात भारतीयांना एकत्र करत आहे. काँग्रेस याला भारत जोडो म्हणतं पण त्यांचा खरा अजेंडा हा भारत तोडो असा आहे. NDA ने UPA पेक्षा कर्नाटकला 247% जास्त दिलं आहे आणि फक्त विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे. आमचं राजकारण विकासासाठी आहे. त्यांचं फक्त राजकारण, विकास विसरा!" असं प्रल्हाद जोशी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आता ओडिशामध्ये पोहोचली आहे. ओडिशामध्ये पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी राज्यातील जनतेला विशेष आवाहनही केलं. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की, "मी यात्रेदरम्यान सात ते आठ तास लोकांचे ऐकतो आणि दररोज 15 मिनिटे त्यांना संबोधित करतो."

लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा प्रवास सुरू केल्याचं राहुल यांनी सांगितलं. भारत जोडो यात्रा 2022-23 मध्ये देशाला एकत्र आणण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर असं सुमारे 4,000 किलोमीटर अंतर प्रवास करण्यात आला आणि हा प्रवास “द्वेष आणि अन्यायाविरुद्ध” होता. लाखोंच्या संख्येने या यात्रेत लोक सहभागी झाले होते. त्यामुळेच ही यात्रा यशस्वी झाली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा