शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
3
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
4
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
5
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
6
Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
7
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप?
8
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
9
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
10
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
11
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
12
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
13
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
14
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
15
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
16
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
17
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
18
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
19
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
20
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा

भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला; काँग्रेसचा आरोप, वातावरण तापलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 4:45 PM

जयराम रमेश यांच्या वाहनाला भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घालत घोषणाबाजी सुरू केली.

Bharat Jodo Nyay Yatra ( Marathi News ) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला भारत जोडो न्याय यात्रा असं नामकरण करण्यात आलं असून मणिपूरपासून हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र आता ही यात्रा आसाममध्ये पोहोचल्यानंतर भाजप आणि काँग्रेसदरम्यान संघर्ष निर्माण झाला आहे. कारण माझ्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप या यात्रेमध्ये सहभागी झालेले काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जयराम रमेश यांनी केला आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ज्या मार्गावरून जाणार होती, त्याच मार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. राहुल गांधी सदर परिसरात पोहोचण्याआधी या मार्गाची पाहणी करण्यासाठी आलेल्या जयराम रमेश यांच्या वाहनाला भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घालत घोषणाबाजी सुरू केली. याबाबतचा व्हिडिओ जयराम रमेश यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.

भाजपवर हल्लाबोल करत जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, "काही मिनिटांपूर्वी माझ्या वाहनावर सुनितपूर इथं हल्ला झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या गाडीवर लावलेले भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर्सही फाडले. आमच्यावर पाणी फेकत त्यांनी आमच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हेच असं कृत्य करत आहेत. मात्र आम्ही घाबरलेलो नसून मार्गक्रमण करतच राहू," अशा शब्दांत जयराम रमेश यांनी भाजपविरोधात हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, या घटनेबाबत अद्याप राहुल गांधींकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसBJPभाजपा