शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

Bharat Jodo Yatra: 'हे योग्य नाही...', राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसचे दुसऱ्यांदा अमित शहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 4:42 PM

Rahul Gandhi Security Breach: भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसने दुसऱ्यांना गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

Bharat Jodo Yatra Security Breach: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेवरुन नवीन राजकारण सुरू झाले आहे. यातच सीआरपीएफच्या दाव्यानंतर दोन दिवसांनी काँग्रेसने शनिवारी (31 डिसेंबर) पुन्हा भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. सुरक्षा व्यवस्थेबाबत काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दुसऱ्यांदा पत्र लिहिले आहे. यापूर्वी, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने म्हटले होते की राहुल गांधी यांनी अनेक प्रसंगी मार्गदर्शक तत्त्वांचे "उल्लंघन" केले होते.

काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, सीआरपीएफकडून मिळालेल्या प्रतिसादाविरोधात आम्ही चिंता व्यक्त करत आहोत. हे अस्वीकार्य आहे, कारण यामुळे समस्या सुटत नाही तर ती मोठी होते. पहिल्या पत्रात काँग्रेसने यात्रेच्या दिल्ली टप्प्यात सुरक्षेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. यानंतर सीआरपीएफने त्यावर प्रत्युत्तरही दिले. 

काय म्हणाले सीआरपीएफ?सीआरपीएफ राहुल गांधींना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा पुरवते. सुरक्षा एजन्सीने काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांच्या आरोपांना उत्तर दिले होते की, राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे मार्गदर्शक तत्त्वांनुसार केल्या गेल्या आहेत. यात्रे दरम्यान राहुल गांधींनी 113 वेळा नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती सीआरपीएफने दिली. 

काँग्रेसने पुन्हा पत्र लिहिलेसीआरपीएफच्या दाव्यानंतर आपल्या ताज्या पत्रात, काँग्रेसने पुन्हा एकदा सोहना, हरियाणातील घरफोडीचा मुद्दा उपस्थित केला आणि सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांमधील समन्वयाच्या अभावावरही भर दिला. मात्र, यापूर्वी शहर पोलिसांशी चर्चा झाल्याचे स्पष्टीकरण सुरक्षा यंत्रणेने दिले होते.

"अज्ञात लोक राहुल गांधींच्या खूप जवळ आले"

काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या नवीन पत्रात असे लिहिले आहे की, "अनेकदा अज्ञात लोक राहुल गांधींच्या खूप जवळ आले होते. त्याचे व्हिडिओ आणि फोटोग्राफिक पुरावे शेअर केले जाऊ शकतात." हरियाणा पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या कर्मचार्‍यांनी यात्रेत घुसखोरी केल्याचे पक्षाने म्हटले आहे.  भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, या विश्वासाने भारत जोडो यात्रेत आम्ही पुढे जात आहोत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाह