शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
4
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
5
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
6
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
7
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
8
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
9
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
10
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
11
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
12
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
13
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
14
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
15
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
16
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
17
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
19
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
20
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन

Airtel Success Story : Hero सायकलच्या मालकाकडून घेतली ५ हजारांची उधारी; आज टेलिकॉम क्षेत्रात Airtel ठरली लय भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:51 IST

Airtel Success Story : पाहा कसा होता पुश बटन असलेल्या फोनच्या इम्पोर्टपासून एअरटेल पर्यंतचा मित्तल यांचा प्रवास.

Airtel Success Story : देशातील कोट्यवधी युझर्स आजच्या घडीला एअरटेलचं (Airtel) सिमकार्ड वापरत असतील. एअरटेलला देशात आणि परदेशात उभं करण्याचा सुनिल मित्तल (Sunil Mittal) यांचा आजवरचा प्रवास हा थक्क करणारा आहे. "ज्यावेळी चेकचा सर्वाधिक वापर केला जात होता ही तेव्हाची गोष्ट आहे. मी एकदा हिरो सायकलचे संस्थापक ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्याकडे गेलो आणि ५ हजार रूपयांचा चेक लिहिण्यास सांगितलं. त्यांनीही लगेच त्याला होकार दिला. परंतु मी त्या ठिकाणाहून निघताना त्यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या हृदयात घर करून गेली. त्यांनी मला सांगितलं की याची कधीही सवय करून घेऊ नकोस." एकदा सुनिल मित्तल यांनी आपल्या सुरूवातीच्या दिवसांची आठवण काढत हा किस्सा सांगितला होता. ५ हजार रूपयांची उधारी घेणारे तेच सुनिल मित्तल आज ४.३६ लाख कोटी रूपयांच्या एअरटेल या कंपनीचे मालक आहेत. ३५ कोटी युझर्ससह एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी ठरलीये.

सुनिल मित्तल यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथे २३ ऑक्टोबर १९५७ ला झाला. त्यांचं वडील सतपाल मित्तल हे एक राजकारणी होते आणि दोन वेळा ते खासदार म्हणूनही निवडून गेले होते. मित्तल यांनी सुरुवातीचं शिक्षण मसूरी येथील विनबर्ग स्कूलमधून केलं. यानंतर त्यांनी पुढील शिक्षण ग्वाल्हेरमधील सिंधिया स्कूलमधून केलं. १९७६ मध्ये त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी मिळवली. आपल्याला शाळेपेक्षा रस्त्यावरून अधिक शिकता आलं असं मित्तल म्हणतात. लुधियानामधील परिस्थिती अशी होती की त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

अनेक गोष्टींचा घेतला अनुभवपदवीचं शिक्षण घेतल्यानंतर मित्तल यांनी आपल्या वडिलांकडून २० हजार रूपये घेतले आणि सायकल पार्ट्सचं काम सुरू केलं. परंतु या कामालाही मर्यादा आहेत, असं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर १९८० मध्ये व्यवसायाची संधी शोधण्यासाठी त्यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली भावंडं राकेश आणि राजन यांच्यासोबत मिळून भारती ओव्हरसीज ट्रेडिंगची स्थापना केली. त्यांनी सुरू केलेल्या सायकलच्या व्यवसायाची विक्री करून इंपोर्ट लायसन्सही मिळवला.सुनिल मित्तल यांनी सर्वप्रथम सुझुकीची डिलरशीप मिळवली आणि भारतात त्यांच्या इलेक्ट्रीक पॉवर्ड जनरेटर्सची विक्री सुरू केली. यामध्ये त्यांना मोठा नफाही मिलाला आणि व्यवसायही चांगला सुरू झाला. या व्यवसायात पूर्णपणे हात बसत होता, तोवर १९८३ मध्ये सरकारनं जनरेटरच्या निर्यातीवर बंदी घातली आणि एका फटक्यात त्यांचा व्यवसाय ठप्प झाला.

पुश बटन फोनपासून टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्रीजे यापूर्वी कोणीही केलं नाही तर करायचं हा सुनिल मित्तल यांचा थंब रुल आहे. यामुळेच त्यांनी १९८६ मध्ये पुश बटन फोन इम्पोर्ट करण्याचा निर्णय घेतला. ते तैवानमधून पुश बटन फोन इम्पोर्ट करू लागले आणि भारतात त्याला बीटेल या ब्रान्डच्या नावाखाली विकू लागले. यामध्येही त्यांना मोठा नफा झाला. १९९० च्या दशकापर्यंत त्यांनी फोन व्यतिरिक्त फॅक्स मशीन आणि अन्य दूरसंचार उपकरणांच्या उत्पादनाला सुरूवात केली. 

१९९२ मघ्ये सरकारनं पहिल्यांदा मोबाईल सेवांसाठी लायसन्स वाटप सुरू केलं. त्यांनी ही संधी असल्याचं पाहत फ्रेन्च कंपनी विवेंडीसोबत दिल्ली आणि आसपासच्या भागासाठी सेल्युलर लायसन्स मिळवला. १००५ मध्ये सुनिल मित्तल यांनी सेल्युलर सेवांसाठी भारती सेल्युलर लिमिटेडची स्थापना केली आणि  एअरटेल या ब्रँड अंतर्गत काम सुरू केलं. पाहता पाहता एअरटेलचे २० हजार, २० लाख आणि नंतर २० कोटी ग्राहक झाले.

आक्रमक स्ट्रॅटजी१९९९ मध्ये भारती एन्टरप्राईजेसनं कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात सेल्युलर ऑपरेशन्स वाढवण्यासाठी जेटी होल्डींग्सचं अधिग्रहण केलं. त्यानंतर २००० साली भारतीनं चेन्नईत स्कायसेल कम्युनिकेशन्सचंही अधिग्रहण केलं. यानंतर २००१ मध्ये कंपनीनं स्पाईस सेल कोलकाताचं अधिग्रहण केलं. यानंतर कंपनी बीएसई आणि एनएसईमध्ये लिस्ट करण्यात आली.  २००८ मध्ये एअरटेलचे भारतात ६ कोटी ग्राहक होते. त्यावेळी एअरटेलचं व्हॅल्यूएशन ४० बिलियन डॉलर्स होतं. यामुळे भारती एअरटेल जगातील टॉपची कंपनी बनली.

जिओ लाँच झाल्यावर धक्का२०१६ मध्ये रिलायन्स जिओ लाँच झाल्यानंतर एअरटेलला मोठा झटका बसला. जिओच्या लाँचवेळी भारतात ८ दूरसंचार कंपन्या होत्या. आता त्यापैकी केवळ चारच शिल्लक आहेत. त्यावेळी एव्हरेज कॉलिंग रेट हा ५८ पैसे प्रति मिनिट होता, तो २०१८ मध्ये कमी होऊन १८ पैसे आणि आता त्यापेक्षाही खाली आला आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एअरटेललाही आपले दर मार्केटनुसार खाली आणावे लागले.

"आम्हाला नफ्यात येण्यासाठी जवळपास ३०० रूपये आरपूवर यावं लागेल. आता आम्ही टॅरिफ वाढवून १६२ रूपयांच्या आरपूवर आलो आहोत. पाण्यातून डोकं वर काढण्यासाठी आम्हाला २०० रूपये आरपूवर जावं लागेल," असं मत एअरटेल इंडिया आणि साऊथ एशियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी व्यक्त केलं.तर दुसरीकडे एअरटेलची परिस्थिती थोडी बिकट होण्यामागे त्यांनी ग्राहकांना हलक्यात घेतल्याचं मत एका ज्येष्ठ पत्रकारानं व्यक्त केलं. ज्यावेळी जिओ ४जी सेवा आणण्याचे प्रयत्न करत होता, तेव्हा एअरटेलनं काहीच केलं नाही.

एअरटेल भारतात २५ वर्षांपासून लीडर होती. ते आपली २जी आणि ३जी सेवा सुधारण्याचंच काम करत होते. एअरटेलनं खुप उशिरा ४ जी सेवांवर काम सुरू केलं. परंतु सध्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. एअरटेल न केवल आता आपला कस्टमर बेस वाढवत आहे, त्यांनी प्रीपेड प्लॅन्समध्ये २५ टक्क्यांची वाढ करून नफ्यात येण्याचेही प्रयत्न सुरू केले आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Sunil Mittalसुनिल मित्तलAirtelएअरटेलInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी