शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘शीशमहल’ ढासळला, दिल्लीत कमळ फुलले; भाजपाला ४० जागांचा फायदा, 'आप'ला बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 06:17 IST

नरेंद्र मोदींच्या जादूसमोर अरविंद केजरीवालांची आप झाली साफ; २७ वर्षांनी भाजप सत्तेत; काँग्रेसला फोडता आला नाही भोपळा

चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली : सत्ताधारी आम आदमी पक्षाला भुईसपाट करीत भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेवर भगवा फडकविला आहे. भाजपने ४८ जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. तर आपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीतही खाते उघडता आलेले नाही. 

भाजपने दिल्लीची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढविली होती. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीचे व्यवस्थापन सांभाळले होते. भाजपने निवडणुकीच्या प्रचारात भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांची फौज उतरविली होती. यात आपचे पानिपत झाले.  भाजपचे प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून ३० हजार ८८ मते मिळवत अरविंद केजरीवाल यांचा ४०८९ मतांनी पराभव केला. केजरीवाल यांना २५९९९ मते मिळाली. 

दिल्ली निवडणुकांत भाजप, मित्रपक्षांना मिळालेला विजय हा विकास, उत्तम कारभाराला मिळालेली पोचपावती आहे. दिल्लीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचे सरकार कसून प्रयत्न करेल.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मुख्यमंत्रिपदासाठी कोण चर्चेत?

प्रवेश  वर्मा : माजी खासदार तथा भाजपचे दिल्लीतील प्रमुख नेत्यांपैकी एक. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे ते पुत्र आहेत. त्यांनी केजरीवाल यांचा पराभव केला.

विजेंद्र गुप्ता : दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष. आपचे वर्चस्व असूनही २०१५, २०२० मध्ये त्यांनी यश मिळविले होते. दिल्ली विधानसभेत त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सांभाळले आहे.

सतीश उपाध्याय : भाजपचा दिल्लीतील महत्त्वाचा चेहरा. ते पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, दिल्ली युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि एनडीएमसीचे उपाध्यक्ष होते. प्रशासकीय अनुभवासह त्यांनी पक्षसंघटनेत विविध पदांवर काम केले आहे.

आशिष सूद : भाजपचा दिल्लीतील पंजाबी चेहरा मानले जातात. ते दिल्ली भाजपचे सरचिटणीस होते. गोवा, काश्मीरमध्ये भाजपच्या संघटनात्मक गोष्टींची काही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

जितेंद्र महाजन : जितेंद्र महाजन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. त्यानंतर ते राजकारणात आले. रोहतास नगर मतदारसंघात आपच्या उमेदवार सरिता सिंह यांचा त्यांनी पराभव केला.

सहापट विजयी उमेदवार

भाजपने २०२०च्या तुलनेत आता सहा पटीने विजय मिळविला आहे. २०२०मध्ये भाजपचे आठ आमदार निवडून आले होते. आता भाजपचे ४८ आमदार निवडून आले आहेत. भाजपला ४० जागांचा फायदा झाला आहे. आपला ४० जागांचा फटका बसला.  भाजपला ४५.५६ टक्के मते मिळाली असून २०२० च्या तुलनेत ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. आपला ४३.५७ टक्के मिळाली आहेत. काँग्रेसला ६.३४ टक्के मते मिळाली.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025BJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी