शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर यांची तुरुंगातून मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 06:19 IST

तुरुंगातून बाहेर येताच चंद्रशेखर यांचा भाजपावर हल्लाबोल

सहारणपूर: गेल्या वर्षी सहारणपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर यांची सुटका करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधीलयोगी आदित्यनाथ सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली चंद्रशेखर यांना अटक केली होती. मात्र शिक्षा पूर्णआधीच भाजपा सरकारनं त्यांची सुटका केली आहे. मध्यरात्री 2 वाजून 24 मिनिटांनी चंद्रशेखर यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केलं. पुढील निवडणुकीत भाजपाचा पराभव करु, अशी गर्जना त्यांनी केली. चंद्रशेखर यांची शिक्षा नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार होती. मात्र उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारनं त्याआधीच त्यांची सुटका केली. तुरुंगातून बाहेर पडताच चंद्रशेखर यांनी आपल्या समर्थकांसह मोर्चा काढत भाजपावर निशाणा साधला. त्यावेळी त्यांच्या हातात संविधानाची एक प्रत होती. लढाई आता कुठे सुरू झाली आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं. लोकसभा निवडणुकीआधी भीम आर्मी आणि अनुसूचित जाती-जमातींची नाराजी दूर करण्यासाठी भाजपानं चंद्रशेखर यांची मुदतीआधीच सुटका केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र तुरुंगातून बाहेर येताच चंद्रशेखर यांनी भाजपावर केलेला शाब्दिक हल्ला लक्षात घेता, हा डाव उलटण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात भीम आर्मीचं प्राबल्य आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या आंदोलनाच्या माध्यमातून या भागात आपली पाळंमुळं घट्ट रोवण्याचा भीम आर्मीचा प्रयत्न आहे. कैराना आणि नूरपूरमधील पोटनिवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. भीम आर्मीमुळे या जागा भाजपाला गमवाव्या लागल्या, असं भाजपाचे या भागातील नेते खासगीत कबूल करतात. राज्याच्या पश्चिम भागातील अनुसूचित जाती-जमाती आणि मुस्लिम मतांची मोट बांधण्यात भीम आर्मीला यश आलं आहे. भाजपाच्या दृष्टीनं ही चिंतेची बाबा आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा