शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Bhim Army: सत्ता परिवर्तनासाठीची लढाई सुरूच राहिल, पराभवानंतर बोलले चंद्रशेखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 20:08 IST

चंद्रशेखर आझाद यांनी पराभवानंतर ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट लिहून मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मोठा विजय मिळाला आहे. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमाही राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर पोहोचली आहे. कारण, युपीत 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे योगी आदित्यनाथ हे पहिलेच मुख्यमंत्री ठरत आहेत. योगींनी गोरखपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी सहजच विजय मिळवला. येथे योगींविरुद्ध लढणारे भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचा मोठा पराभव झाला आहे. 

चंद्रशेखर आझाद यांनी पराभवानंतर ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट लिहून मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच, उत्तर प्रदेशातील सत्ता परिवर्तनाची लढाई सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी सांगतिलं. निवडणूक निकालातील जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो, पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेसोबत आमची ओळख झाली. आता, बहुजन समाजाला सत्तेत बसविण्यासाठी बहुजन समाजातील महापुरुष, वीरांगनांची विचारधार बहुजन हिताय, बहुजन सुखायला पुढे न्यावे लागणार आहे. यापुढील संघर्षाला सर्वच कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन मी करतो. सामाजिक व सत्ता परिवर्तनाची आपली लढाई सुरूच राहिल, असेही आझाद यांनी म्हटले.

आझाद यांना मिळाली 7543 मतं

गोरखपूर शहर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निकालाच्या दिवशी सकाळपासूनच ते निकालात बाजी मारताना दिसून आले. निवडणूक आयोगने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार शेवटचा निकाला हाती आला तेव्हा, योगी आदित्यनाथ यांना 1,64,170 मतं मिळाली आहेत. तर, योगींविरुद्ध समाजवादी पक्षाच्या शुभावती उपेंद्र दत्त शुक्ला यांना 60,896 मतं मिळाली आहे. आझाद समाज पक्षाकडून चंद्रशेखर आझात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यांना केवळ 7543 मतं मिळाली. येथून त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे.  

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझादUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाGorakhpurगोरखपूर