शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
3
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
4
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
7
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
8
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
9
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
10
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
11
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
12
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
13
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
14
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
15
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
16
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
17
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
18
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
19
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
20
शशी थरूर यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपचा ऐतिहासिक विजय; काँग्रेस खासदार म्हणाले, "हेच लोकशाहीचं सौंदर्य"
Daily Top 2Weekly Top 5

भीम आर्मीची दिल्लीत जोरदार निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 04:58 IST

संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद निसटले; पोलिसांच्या हातावर तुरी

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जामा मशिदीजवळ जोरदार निदर्शने केली. परवानगी नसतानाही निदर्शने केल्याबद्दल ताब्यात घेतलेले चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटले. त्यांचा शोध सुरू आहे.

निदर्शने करणाऱ्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हातात तिरंगी ध्वज घेतले होते. राज्यघटनेला वाचवा तसेच इन्किलाब झिंदाबाद अशा घोषणा ते देत होते. त्यातले काही जण सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गाणे गात होते. जामा मशिदीच्या एक क्रमांकाच्या प्रवेशव्दाराजवळ जमा झालेल्या या निदर्शकांपैकी काही जणांच्या हाती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम, भगतसिंह यांची छायाचित्रे असलेले फलक होते. दिल्लीमध्ये लागू केलेले जमावबंदीचे आदेश मोडून हजारो विद्यार्थी, विरोधी पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरून गेल्या काही दिवसांत निदर्शने केली होती. तोेच कित्ता भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी गिरवला.

जमावबंदीचे आदेश झुगारुन निदर्शने केल्याच्या आरोपावरून अटक केलेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जामा मशिदीच्या जवळ पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तिथे यश न आल्यामुळे दर्यागंज भागामध्ये पुन्हा त्यांना पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन चंद्रशेखर आझाद तिथून निसटले असे भीम आर्मीच्या सूत्रांनी सांगितले. मात्र पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही.

४८ जणांना अटकगुजरातमधील अहमदाबाद शहरातील शहा-ए-आलम भागात गुरुवारी झालेल्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले होते. या प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक शहजाद खान पठाण व ४८ जणांना अटक करण्यात आली आहे. शहजाद खान पठाण यांनी जमावाला भडकाविण्याचा प्रयत्न केला असाही त्यांच्यावर आरोप आहे. निदर्शकांनी केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह २६ पोलीस जखमी झाले होते.

नव्याने घुसखोरी होणार नाही : सोनोवालनागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे बांगलादेशमधून नव्याने घुसखोरी होण्यास प्रोत्साहन मिळणार नाही. या कायद्याचा आधार घेऊन बांगलादेशमधील एकही व्यक्ती आसाममध्ये येणार नाही असे आसामचे मुख्यमंत्री सवर्नंद सोनोवाल यांनी शुक्रवारी सांगितले. ते म्हणाले की, शेजारी राष्ट्रांत होणाºया धार्मिक छळाला कंटाळून तेथील जे नागरिक अनेक वर्षांपूर्वी भारतात आले त्यांनाच या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. अशा लोकांची संख्या मोजकी असेल. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर आसाममधील मूळ रहिवाशांची वांशिक ओळख पुसली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBhim Armyभीम आर्मी