शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
4
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
5
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
6
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
7
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
8
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
9
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
10
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
11
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
12
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
13
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
14
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
15
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
16
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
17
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
18
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
19
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
20
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

कर्मचार्‍यांना दिली जबाबदारीची समज बीएचआर : आवश्यकतेनुसार करणार कर्मचारी नियुक्ती

By admin | Published: November 10, 2015 8:19 PM

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अधिकारी व कर्मचार्‍यांची सलग दुसर्‍या दिवशी अवसायक जितेंद्र कंडारे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत ठेवीदारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पतसंस्थेचे कार्यक्षेत्र आणि कामाचा आवाका पाहून आवश्यकतेनुसार कर्मचारी भरती करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अधिकारी व कर्मचार्‍यांची सलग दुसर्‍या दिवशी अवसायक जितेंद्र कंडारे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत ठेवीदारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पतसंस्थेचे कार्यक्षेत्र आणि कामाचा आवाका पाहून आवश्यकतेनुसार कर्मचारी भरती करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
कर्मचार्‍यांची घेतली पुन्हा बैठक
बीएचआर पतसंस्थेच्या प्रत्यक्ष कामाला १६ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असली तरी कंडारे यांनी शाखा व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कर्ज वसुली अधिकारी, प्रशासन अधिकारी यांची मंगळवारी पुन्हा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांकडे कोणकोणती जबाबदारी होती त्याबाबत प्रत्येकांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. तसेच प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. यावेळी पतसंस्थेचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सीआयडीकडील कागदपत्रे घेणार
बीएचआर पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या विरोधात रामानंद नगर, जिल्हापेठ, धरणगाव, चोपडा व जामनेर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. या गुन्‘ांशी संबंधित रेकॉर्ड पोलिसांनी जप्त केले आहे. त्यानंतर हा गुन्हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांनी पदभार स्विकारल्यानंतर या कागदपत्रांच्या मागणीची प्रक्रिया सुरू केली आहे. या कागदपत्रांशिवाय कर्जवसुलीला वेग देता येणार नसल्याने त्यांनी हालचाल सुरू केली आहे.
कर्मचार्‍यांची भरती करणार
बीएचआर पतसंस्थेच्या २५० पेक्षा जास्त शाखा राज्यभरात आहेत. संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर ठेवीच्या मागणीसाठी ठेवीदारांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे अनेक कर्मचारी हे नोकरीचा राजीनामा देऊन सोडून गेले आहेत. काही महिन्यांपासून मोजक्या कर्मचार्‍यांवर पतसंस्थेचे काम सुरू होते. त्यामुळे काही शाखा बंद करण्यात आल्या. सध्या आहे त्या कर्मचार्‍यांमध्ये काम करण्यावर भर राहणार आहे. मात्र सुरळीत कामकाज करण्यासाठी आवश्यकता वाटेल त्यावेळी कर्मचार्‍यांची भरती करण्यात येईल अशी माहिती कंडारे यांनी दिली.
ठेवीदारांची गर्दी सुरुच
बीएचआर पतसंस्थेवर अवसायक बसल्यानंतर ठेवीदारांचा ओघ सुरुच आहे. आपल्या ठेवीची रक्कम मिळावी यासाठी वयोवृद्ध नागरिक तसेच ठेवीदार रोज मुख्य कार्यालयात चकरा मारत आहेत. मंगळवारी पुन्हा काही ठेवीदारांनी कंडारे यांची भेट घेत ठेवीची रक्कम परत करण्याची विनंती केली.