शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

‘बिद्री’ ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्यास बांधील

By admin | Published: October 15, 2015 11:35 PM

के. पी. पाटील : श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन

सरवडे : बिद्री येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यास गळितास आलेल्या उसाला एफ.आर. पी.प्रमाणे दर देण्यास बांधील आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. बिद्री साखर कारखान्याच्या ५३ व्या ऊस गळीत हंगामाच्या बॉयलर प्रदीपन समारंभात ते बोलत होते. अध्यक्ष पाटील व त्यांच्या पत्नी मायादेवी पाटील या उभयंतांच्या हस्ते होमहवन व सत्यनारायण पूजा होऊन बॉयलर प्रदीपन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना पाटील म्हणाले, एफ.आर.पी.प्रमाणे दर देणे कायद्याने बंधनकारक आहे. ‘बिद्री’ने गेल्या दहा वर्षांत कायमपणे एफ. आर. पी.पेक्षा अधिक दर दिला आहे. मागील हंगामात साखर दराच्या घसरणीमुळे शेवटच्या महिन्यात आलेल्या उसाला वेळेत एफ. आर. पी. प्रमाणे रक्कम देता आली नाही. गेली दहा वर्षे या कारखान्यात सभासदांचे विश्वस्त म्हणून काम करत असताना सभासदांच्या विश्वासाला तडा जाईल, असे कोणतेही काम आमचेकडून झालेले नाही व यापुढे होणार नाही. ते म्हणाले, सध्या साखरेचे दर सुधारू लागले आहेत. केंद्र शासनाने प्रत्येक कारखान्याच्या उत्पादनातील १२ टक्के अशी देशातील ४० लाख मे. टन साखर निर्यात करणे सक्तीचे केल्यामुळे पुढील हंगामात साखरेचे दर टिकून राहतील. साखरेचे दर असेच राहिल्यास एफ.आर.पी.प्रमाणे दर देण्यास अडचण येणार नाही. ते म्हणाले, या वर्षापासून लागण नोंदीत सुसूत्रता येण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर संगणकीकृत लागण नोंदी होणार आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्यास त्याचा वापर सर्व कार्यक्षेत्रात करण्याचे नियोजन आहे. संचालक ए. वाय. पाटील, विजयसिंह मोरे, नामदेवराव भोईटे, डी. एस. पाटील, दत्तात्रय खराडे, गणपतराव फराकटे, वसंतराव पाटील, पंडितराव केणे, के. जी. नांदेकर, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, जीवन पाटील, नेताजी पाटील, सुनील कांबळे, सविता एकल, कमल चौगले, विलास झोरे, भीमराव किल्लेदार, शिवाजी केसरकर, ‘गोकुळ’चे संचालक विलासराव कांबळे, बाजार समितीचे संचालक उदयसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य रघुनाथ कुंभार, विश्वनाथ कुंभार, तालुका संघाचे संचालक कृष्णात फराकटे, निवासराव देसाई उपस्थित होते. कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)