शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात मोठा वाद, बड्या नेत्याला केले पक्षातून निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 2:57 PM

BJP News: राज्यस्थान भाजपाममध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपाने पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केले आहे.

 राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यस्थान भाजपाममध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपाने पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केले आहे. कैलाश मेघवाल हे गेल्या काही काळापासून सातत्याने केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यावर टीका करत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आजही जयपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपामध्ये गटबाजी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. कैलाश मेघवाल हे वसुंधरा राजे गटातील नेते मानले जातात.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यावर सार्वजनिक मंचावरून आरोप केल्यानंतर कैलाश मेघवाल यांना पक्षाने कारणे दाखवा नोटिस बजावली होती. तसेच त्यांना दहा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले होते.  त्यानंतर कैलाश मेघवाल यांनी आज पुन्हा प्रेस कॉन्फ्रन्स घेत अर्जुनराम मेघवाल यांच्यावर आरोप केले होते. तसेच पक्षात गटबाजी असल्याचा दावा केला होता.

कैलाश मेघवाल यांच्या निलंबनाबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.पी. जोशी यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर प्रभारी अरुण सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेईन आणि नंतर प्रतिक्रिया देईन, असे सांगितले. कैलाश मेघवाल यांच्या निलंबनानंतर राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र कुठलाही नेता याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळत आहे.

दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मेघवाल म्हणाले की, मी वसुंधराजींना काहीही बोलणार नाही. मात्र कधीकाळी मी हीरो होतो. आता झीरो झालो आहे. पक्षामध्ये माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. माझ्या पक्षातील काही लोक अर्जुनराम मेघवाल यांची तुलना डॉ. आंबेडकर यांच्याशी करत आहेत. हे केवळ त्यांचं महिमामंडन करण्यासाी केलं जातंय. मी राजकारणात सक्रिय होतो आणि यापुढेही राहीन. मी सार्वजनिकपणे वसुंधरा राजे यांच्यावर कुठलाही आरोप कधीही केलेला नाही.

ते पुढे म्हणाले की, मी भाजपामध्ये आहे. मोदींवर माझी कुठलीही नाराजी नाही आहे. माझी राजकीय कारकीर्द प्रदीर्घ राहिली आहे. माझ्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. माझ्यावर अन्याय होतोय. सध्या भाजपा गटबाजीमध्ये विखुरली आहे. तसेच वसुंधरा राजे गटाला समाप्त करण्याचेही प्रयत्न होत आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थान