शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

मोठा मानापमान...! नितिशकुमार लोजपाच्या कार्यालयात गेले, पण चिराग पासवान नव्हते, फोन केला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:29 IST

दही-चुडाचे आयोजन वर्षानुवर्षाचे वाद, रुसवेफुगवे मिटविण्यासाठी केले जाते. यातही राजकारण झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर एनडीएत मानापमानाचा वाद पेटणार आहे.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आणि लोजपाचे चिराग पासवान यांच्यात जोरदार राजकारण रंगले आहे. निमित्त होते संक्रांतीवेळच्या दही-चुडा भोजनाचे. पासवान यांनी त्यांच्या कार्यालयात दही-चुडाचे आयोजन केले होते. एनडीएत असल्याने व पुढील निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी नितीशकुमार यांना बोलविले होते. नितिशकुमार दहीचुडासाठी लोजपा कार्यालयात आले तेव्हा पासवान गैरहजर राहिले. यावरून आता दोघांमधील राजकारण पेटण्याची शक्यता आहे. 

दही-चुडाचे आयोजन वर्षानुवर्षाचे वाद, रुसवेफुगवे मिटविण्यासाठी केले जाते. यातही राजकारण झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर एनडीएत मानापमानाचा वाद पेटणार आहे. लोजपा कार्यालयात बोलविले परंतू चिराग पासवानच नसल्याने नितीश कुमार नाराज झाले आहेत. त्यांनी दही-चुडाचे भोजन न करताच तिथून काढता पाय घेतला. 

जदयूच्या नेत्यांनी हा मुख्यमंत्र्यांचा झालेले अपमान म्हटले आहे. तर पासवान यांनी यावर मुख्यमंत्री आले तेव्हा आपण पुजेला बसलो होते. लगेचच तिकडे जाणे शक्य नव्हते. परंतू, मुख्यमंत्री आले हे आमच्यासाठी सन्मानाचे आहे. कार्यकर्त्यांसाठी ही मोठी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेचा आम्ही सन्मान करतो, असे म्हटले आहे. 

सूत्रांनुसार या घटनेनंतर चिराग पासवान यांनी नितिशकुमार यांना अनेकदा फोन केला, परंतू त्यांनी पासवान यांच्याशी चर्चा केली नाही. लोजपाला नितिशकुमार यांच्यामुळे कार्यालयासाठी बंगला मिळाला आहे. या बंगल्यामध्ये पूर्वी पशुपती पारस यांचा पक्ष होता. त्यांच्याकडून हा बंगला खाली करून तो चिराग यांना देण्यात आला. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारchirag paswanचिराग पासवानBiharबिहार