शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
2
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
3
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
4
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
5
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
6
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
7
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
8
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
9
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...
10
माघारीसाठी दबाव, पण सदा सरवणकरांचं अखेर ठरलं; मुलाच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा
11
एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! गॅरी कस्टर्न यांचा राजीनामा; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क
13
Arvind Kejriwal : "भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा
14
“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले
15
"प्रसिद्ध अभिनेत्याने मला एकटीला बोलवलं...", ईशा कोप्पिकरला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव
16
मविआमधील तिढा सुटेना, शरद पवार यांनी जागावाटपाबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...  
17
Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा
18
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
19
भारताच्या अरमान भाटीयाने जिंकली इंडिया मास्टर्स पिकलबॉल स्पर्धा; अमेरिकन खेळाडूला हरवलं!
20
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास

मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:24 AM

Census in India: जनगणनेचा १९९१, २००१, २०११ असे दर दहा वर्षांचे चक्र बदलले आहे. २०२५ ला सुरु होणारी जनगणना ही २०२६ पर्यंत चालणार आहे.

नवी दिल्ली: देशातील जनगणना पुढील वर्षीपासून सुरु होण्याची शक्यता आहे. दर १० वर्षांनी होणारी जनगणना २०२१ मध्ये होणे अपेक्षित होते. परंतू ती आता २०२५ ला सुरु केली जाणार आहे. यामुळे त्यापुढील जनगणना ही २०३५ ला होणार आहे. 

कोरोनामुळे २०२१ ला अपेक्षित असलेली जनगणना टाळण्यात आली होती. यामुळे जनगणनेचा १९९१, २००१, २०११ असे दर दहा वर्षांचे चक्र बदलले आहे. २०२५ ला सुरु होणारी जनगणना ही २०२६ पर्यंत चालणार आहे. या जनगणनेमुळे लोकसभेच्या जागा वाढविण्याचा रस्ता देखील मोकळा होणार आहे. 

केंद्र सरकारच्या वरिष्ठ पदावरील सूत्रांनुसार पुढील जनगणनेचे आकडे २०२६ मध्ये जाहीर केले जाणार आहे. जनगणनेची माहिती नोंद करण्याची प्रक्रिया २०२५ मध्ये सुरु होणार आहे. जनगणना झाल्यानंतर लोकसभेच्या जागांचे सीमांकन सुरू होईल. लोकसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा, त्यांची संख्या वाढविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. २०२८ पर्यंत सीमांकन पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

सरकारने जातीय जनगणनेचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. या जनगणनेमध्ये धर्म आणि वर्गाचा विचार केला जातो. परंतू यावेळी लोकांना त्यांचा पंथही विचारला जाण्याची शक्यता आहे. 

जनगणनेमध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. पण यावेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, कर्नाटकात लिंगायत जे सामान्य श्रेणीतील आहेत, ते स्वतःला एक वेगळा पंथ मानतात. त्याचप्रमाणे वाल्मिकी, रविदासी इत्यादी अनुसूचित जातींमध्ये विविध पंथ आहेत. म्हणजेच धर्म, वर्ग आणि पंथाच्या आधारावर जनगणना करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत आहे. 

टॅग्स :lok sabhaलोकसभा