शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

४० वर्षांतील सर्वात मोठी हानी

By admin | Published: October 31, 2016 7:15 AM

ओडिसाच्या मलकानगिरी जिल्ह्यात २४ आॅक्टोबर रोजी पोलीस दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २८ जण मारले

रायपूर : ओडिसाच्या मलकानगिरी जिल्ह्यात २४ आॅक्टोबर रोजी पोलीस दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २८ जण मारले जाणे ही आपल्या संघटनेच्या ४० वर्षांच्या ‘क्रांतीकारी लढ्या’तील सर्वात मोठी हानी असल्याची कबुली भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेने दिली असून याच्या निषेधार्थ महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या पाच राज्यांमध्ये येत्या ३ नोव्हेंबर रोजी ‘बंद’ची हाक दिली आहे.स्वत:ला संघटनेचा मध्य क्षेत्राचा अधिकृत प्रवक्ता म्हणविणाऱ्या प्रताप नावाच्या व्यक्तीने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, २४ आॅक्टोबरच्या सकाळी ओडिशात आमचे २७ सदस्य मारले गेले. गेली ४० वर्षे पक्षाने हाती घेतलेल्या क्रांतिकारी संघर्षातील ही सर्वात मोठी हानी होती. पक्षाचे आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगढ व तेलंगणमधील अनेक ज्येष्ठ नेते व सदस्य त्या कारवाईत मारले गेले. आमच्या सदस्यांना सरकारने कपटाने मारले व त्यासाठी शरण आलेल्या माओवाद्यांती मदत घेण्याचा दुनाच हातखंडा वापरला गेला.परंतु सरकारच्या अशा कपटी कारस्थानांनी पक्ष दुबळा न होता आमचा लढा यापुढेही सुरुच राहील, अशी वल्गना करताना या प्रसिद्धी पत्रकात असा आरोप केला गेला की, पोलिसांनी आमच्या ११ जखमी सदस्यांना पकडले व नंतर छळ करून त्यांना ठार केले. मोदी सरकार आणि राज्यांची सरकारे आदिवासी भागांमध्ये आक्रमकतेने खाणकामे हाती घेत आहे. पण अशा पिळवणुकीने लोकांमधील असंतोष वाढीला लागतो, याचा शासकांना विसर पडला असून याची त्यांना मोठी किंमत मोडावी लागेल, अशी धमकीही या पत्रकात देण्यात आली. (वृत्तसंस्था)>म्हणे, दडपशाही वाढलीयाआधीही अनेक वेळा असे मोठे आघात होऊनही आणि हजारो सदस्य गमावूनही आमच्या क्रांतिकारी लढ्याने खूप मोठा पल्ला गाठला आहे, असा दावा करून पत्रक म्हणते की, आदिवासींच्या पिळवणुकीच्या विरोधात आमची संघटना नेहमीच उभी राहिली आहे. पण ‘आॅपरेशन ग्रीन हंट’चा तिसरा टप्पा हाती घेऊन केंद्र व राज्य सरकारे आमचा लढा चिरडून टाकू पाहात आहेत. (केंद्रीय गृहमंत्री) राजनाथ सिंग यांनी विशाखापट्टणम व कोरापूटला भेट दिल्यानंतर सरकारी दडपशाही वाढली आहे.