शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

Bihar Assembly Election : "कोरोनात मोदी सरकार फेल, पंतप्रधानांनी मजुरांना मदत केली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 15:59 IST

"कोरोना काळात लाखो मजूर पायपीट करून आपल्या घरी येत होते. पण या कोरोनासंकटात मोदी आणि नितीश यांनी मजुरांची मदत केली नाही." (Bihar Assembly Election)

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी एकत्रितपणे बिहारला लुटले आहे - राहुल गांधीराहुल म्हणाले, मजूर पायपीट करत असताना, नितीशजी आणि मोदीजी कुठे होते. बिहारमधील लोकांना बाहेर जाऊन का काम करावे लागते? येथे रोजगार का नाही? असे प्रश्नही राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केले.

पाटणा -काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारार्थ कटिहार येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांना निशाण्यावर घेतले. राहुल म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वप्रथम घंटी वाजवली आणि नंतर फोनची बॅटरी लावायला सांगितली. मात्र, कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही.

राहुल गांधी म्हणाले, कोरोना काळात लाखो मजूर पायपीट करून आपल्या घरी येत होते. पण या कोरोनासंकटात मोदी आणि नितीश यांनी मजुरांची मदत केली नाही. मात्र, काँग्रेस म्हणाली होती, की आम्ही मजुरांची मदत करू इच्छितो. एवढेच नाही, तर पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी एकत्रितपणे बिहारला लुटले आहे आणि आता बिहारमधील लोक त्यांना उत्तर देतील, असेही राहुल म्हणाले.

राहुल म्हणाले, मजूर पायपीट करत असताना, नितीशजी आणि मोदीजी कुठे होते. तेव्हा मदत केली नाही आणि आता मतं मागायला येत आहेत. राहुल यांनी आरोप केला, की हे दोघेही केवळ आपल्या धनाड्य मित्रांचीच मदत करत आहेत. एवढेच नाही, तर बिहारमधील लोकांना बाहेर जाऊन का काम करावे लागते? येथे रोजगार का नाही? असे प्रश्नही राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केले.

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणाले होते, की दोन कोटी लोकांना रोजगार देणार. नितीश कुमारही असेच म्हणाले होते. मात्र, कुणीही आपले आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी संपूर्ण देशाला लाइनमध्ये उभे केले होते. नोटाबंदीच्या काळात केवळ देशातला गरीब नागरीकच रांगेत उभा होता. पंतप्रधान मोदींनी गरिबांच्या खिशातून पैसा काढून तो आपल्या श्रीमंत मित्रांच्या खिशात घातला. एवढेच नाही, तर पूर्वी नोटाबंदी, मग जीएसटी आणि आता शेतकऱ्यांना नष्ट करणारा कायदा तयार करण्यात आला आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBiharबिहार