शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बिहारमध्ये एनआरसीची गरज नाही; विधानसभेत ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 07:03 IST

एनपीआर २०१० नुसार करणार

पाटणा : बिहारमध्येएनआरसीची गरज नाही आणि २०१० च्या प्रारूपानुसार राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत केली जाईल, असा ठराव बिहार विधानसभेत मंगळवारी एकमताने मंजूर करण्यात आला. एनआरसीविरोधी ठराव मंजूर करणारे बिहार हे पहिले भाजपप्रणीत एनडीएशासित राज्य आहे.विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि इतरांच्या स्थगन प्रस्तावरील चर्चेनंतर विधानसभेत यासंदर्भात सर्वपक्षीय ठराव मांडणयात आला. भोजनाच्या सुटीनंतर विधानसभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एनपीआरमध्ये अतिरिक्त रकान्यांचा समावेश करण्यास विरोध असल्याचा पुनरुच्चार केला. केंद्र सरकारने एनपीआरमध्ये अतिरिक्त रकान्यांचा समावेश करण्याचा निर्णय रद्द करावा, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. केंद्र सरकारला लिहिलेले पत्र वाचून दाखविताना ते म्हणाले की, एनपीआरच्या रकान्यात लिंगपरिवर्तितांचा समावेश करण्यात यावा, असा बिहार सरकारने प्रस्ताव दिला आहे. २०१० च्या प्रारूपानुसारच एनपीआरसाठी माहिती घेण्यात यावी, अशी विनंती केंद्राला करण्यात आली आहे. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये. नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेने मंजूर केलेला असून सध्या या कायद्याशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा कायदा वैध आहे की नाही, हे सर्वोच्च न्यायालय निश्चित करील.तत्पूर्वी, सभागृहात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) सत्ताधारी आणि विरोधी पक्षात खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी हा काळा कायदा असल्याचे म्हटले होते. त्यावरून गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.काय म्हणाले, मुख्यमंत्री नितीशकुमार?बिहारमध्ये एनपीआर कशी करणार, याबाबत संभ्रम नसावा. कोणालाही आई-वडिलांची जन्मतारीख किंवा त्यांच्या जन्माचे ठिकाण याबाबत माहिती देण्यास सांगितले जाणार नाही. २०२० च्या प्रारूपानुसार एनपीआर केल्यास काही घटकांसाठी धोकादायक आहे. काही विशेष माहिती घेतल्यास आणि भविष्यात एनआरसी झाल्यास ते अडचणीत येतील, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :National Register of CitizensएनआरसीBiharबिहार