शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
4
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
5
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
6
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
7
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
9
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
10
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
11
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
12
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
13
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
14
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
15
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
16
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
17
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
18
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
19
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
20
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

बिहार बोर्डाच्या परीक्षेत ४८९ गुणांचा योगायोग, तर तब्बल ६० मुली टॉप १० मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:40 IST

Bihar Board 10th Result: बिहारमधील बिहार शालेय परीक्षा मंडळाचा (बीईएसबी) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या निकालानंतर आता संपूर्ण शैक्षणिक वर्तुळामध्ये ४८९ या क्रमांकाची खूप चर्चा होत आहे.

बिहारमधीलबिहार शालेय परीक्षा मंडळाचा (बीईएसबी) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या निकालानंतर आता संपूर्ण शैक्षणिक वर्तुळामध्ये ४८९ या क्रमांकाची खूप चर्चा होत आहे. त्याचं कारण म्हणजे राज्यातील तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८९ गुण मिळाले असून, हे तिघेही संयुक्तरीत्या राज्यातून प्रथम आले आहेत. त्यामध्ये साक्षी कुमारी आणि अंशु कुमारी या दोन विद्यार्थिनी आणि रंजन वर्मा या विद्यार्थ्याचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पहिल्या १०मध्ये स्थान मिळवणाऱ्या एकूण १२३ विद्यार्थ्यांमध्ये ६० मुलींचा समावेश आहे.

पुनीत कुमार सिंह, सचिन कुमार राम आणि प्रियांशू राज यांनी ४८८ गुणांसह संयुक्तरीत्या तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिला पाच क्रमांकांमध्ये २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर ६ ते १० या क्रमांकांमध्ये  ९८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बिहारच्या दहावीच्या परीक्षेत पहिल्या १० क्रामांकांमध्ये १२३ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवलं आहे. त्यात ६३ विद्यार्थी आणि ६० विद्यार्थिनींचा समावेश आहे. गतवर्षी पहिल्या दहा क्रमांकांमध्ये ५१ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवलं होतं. तसेच त्यात २३ विद्यार्थिनींचा समावेश होता.

दरम्यान, बिहार बोर्डाने यावर्षी पहिल्या १० क्रमांकांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ केली आहे. पहिला क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला २ लाख रुपये, एक लॅपटॉप आणि पदक दिलं जाईल. तर दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला १.५ लाख रुपये,  एक लॅपटॉप आणि पदक दिलं जाईल. तर तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला १ लाख रुपये, लॅपटॉप आणि पदक देऊन सन्मानित करण्यात येईल. तर चौथ्या क्रमांकापासून दहाव्या क्रमांकापर्यंतच्या विद्यार्थ्यांना २० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. 

टॅग्स :BiharबिहारEducationशिक्षणexamपरीक्षा