शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

Bihar Bridge : “वाऱ्यामुळे…” पूल पडण्याचं कारण ऐकून गडकरी झाले अवाक्; IAS अधिकाऱ्यानं दिलं चक्रावणारं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:15 AM

Bihar Bridge Collapse : बिहारमधील सुल्तानगंज पासून अगुआनी घाट दरम्यान तयार होत असलेला ब्रिज पडल्याचं कारण ऐकून गडकरीही अवाक् झाले.

Bihar Bridge Collapse : बिहारमध्ये तयारहोत असलेल्या एका पुलाचा काही भार पडल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मिळालेल्या उत्तरानं ते अवाक् झाले. गडकरी यांना असं काही कारण सांगण्यात आलं जे त्यांच्या पचनीच पडलं नाही. जोरदार वारा आणि वादळामुळे हा ब्रिज पडल्याचं कारण त्यांच्या सचिवांनी दिलं.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मिळालेल्या उत्तरानं चक्क अवाक् झाले. २९ एप्रिल रोजी सुल्तानगंजमध्ये गंगा नदीवर तयार होत असलेल्या पुलाचा एक भाग पडला होता. यामध्ये कोणातीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. याबाबत गडकरी यांनी एका कार्यक्रमात भाष्य केलं. बिहारमध्ये २९ एप्रिल रोजी पूल पडला होता. मी या संदर्भात माझ्या सचिवांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी वेगवान वारा आणि वादळामुळे हा पूल पडल्याचं कारण दिल्याचं गडकरी म्हणाले. 

एखादा आयएएस अधिकारी अशाप्रकारच्या स्पष्टीकरणावर कसा विश्वास ठेवू शकतो? असा सवालही त्यांनी केला. “जोरदार वारे आणि वादळामुळे कोणताही पूल कसा पडू शकतो? नक्कीच काहीतरी चूक झाली असेल, ज्यामुळे हा पूल पडला पडला असावा,” असंही ते म्हणाले. कार्यक्रमादरम्यान, गडकरींनी गुणवत्तेत कोणतीही कसर न सोडता पुलांची निर्मिती केली जावी, यावर भर दिला. या पुलाची निर्मिती २०१४ मध्ये सुरू झाली होती. हा पूल २०१९ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु अद्यापही त्याचं काम पूर्ण झालेलं नाही.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBiharबिहार