शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
3
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
4
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
5
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
6
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
7
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
8
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
9
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
10
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
11
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
12
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
13
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
14
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
15
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
16
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
17
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
18
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
19
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
20
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त

बाबो! पतीवर 10 वर्षांपूर्वी केलेले अंत्यसंस्कार; आता अचानक आला परत, तिळावरून पटली ओळख अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 1:57 PM

गावातील घनश्याम तेली 30 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. तो बक्सरच्या बस स्टँडवरुन बेपत्ता झाला होता.

नवी दिल्ली - बिहारमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समजून अंत्यसंस्कार करण्यात आले होते, ती व्यक्ती तब्बल 30 वर्षांनी आपल्या गावी परतला. त्याला पाहून कुटुंबीयांना विश्वासच बसला नाही. शेवटी पत्नीने तीळ पाहून त्याची ओळख पटवली. ही घटना बक्सर जिल्ह्यातील कोरानसराय गावातील आहे. गावातील घनश्याम तेली 30 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. तो बक्सरच्या बस स्टँडवरुन बेपत्ता झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झाल्यावर कुटुंबीयांनी त्याचा खूप शोध घेतला होता, मात्र तो सापडला नाही. शेवटी त्याला मृत समजून कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते. बेपत्ता झालेला तरुण अचानक गावी परतल्याने गावकरीही हैराण झाले आहेत. मात्र घनश्याम तेली यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते काहीच बोलू शकत नाहीत. त्यांचं वयही 55 हून जास्त झाली आहे.

घनश्याम तेली परतल्यामुळे त्यांची पत्नी मुन्नी देवी खूप आनंदात आहे. गावकऱ्यांनी घनश्याम तेली आणि मुन्नी देवी यांचं पुन्हा लग्न लावून दिलं. धुमधडाक्यात दोघांचं लग्न करण्यात आलं. जेवणदेखील ठेवण्यात आलं. मुन्नी देवीने सांगितलं की, 30 वर्षांपूर्वी पती बेपत्ता झाला होता. त्यावेळी त्यांना एक मुलगाही होता. तर त्यावेळी मुन्नी देवी गर्भवती होती. 10 वर्षांपूर्वी तिच्या सासऱ्याच्या निधनानंतर पतीचाही मृत्यू झाल्याचं समजून दोघांवर एकत्रच अंत्यसंस्कार आणि श्राद्ध करण्यात आलं होतं.

19 जुलै रोजी पोलीस ठाण्यातून अचानक फोन आला की, तिचे पती सापडले. हे ऐकून सुरुवातीला तर तिला धक्काच बसला. यानंतर मुलगा आणि जावयाला घेऊन ती पोलीस ठाण्यात गेली. येथे पतीच्या डाव्या मांडीवरील तिळावरुन पतीची ओळख पटवली. मुलगा आणि जावयाने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून पतीची ओळख पटवली.

मुन्नी देवीने दिलेल्या माहितीनुसार, पती बेपत्ता झाल्यानंतर त्याला खूप शोधण्यात आलं. यानंतर सासरची मंडळी आणि गावातील काही लोक तिच्यावरच हत्येचा आरोप लावत होते. पती जेव्हा बेपत्ता झाले तेव्हा त्या 25 वर्षांच्या होत्या. त्यांना दोन मुलंही होते. वडिलांनी तिला दुसरं लग्न करण्यास सांगितलं, मात्र तिने ऐकलं नाही. आता पती अचानक आल्याने तिला खूप आनंदा झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.