शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बिहार मंत्रिमंडळ विस्तारावर कर्नाटक विजयाचा परिणाम, काँग्रेस अधिक मंत्रिपदाची मागणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 14:57 IST

त्याचबरोबर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याबाबत महागठबंधनमध्ये दावा करू 

विभाष झा -

पाटणा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस नेत्यांचे मनोबल वाढले आहे. याची झलक केवळ कर्नाटकमध्येच नव्हे तर शेकडो किलोमीटर दूर असलेल्या बिहारमध्येही पाहण्यास मिळत आहे. कर्नाटकचे निकाल काँग्रेससाठी आशेचा किरण घेऊन आले आहेत. याचा परिणाम देश व अनेक राज्यांत होणाऱ्या आगामी निवडणुकांतही पाहावयास मिळू शकतो. उत्साहित कार्यकर्त्यांनी यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, कर्नाटकच्या निकालाचा परिणाम बिहारमध्येही पाहण्यास मिळेल. म्हणजेच बिहार मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस आता अधिक मंत्री करण्याची मागणी करणार आहेत. त्याचबरोबर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याबाबत महागठबंधनमध्ये दावा करू शकते. महागठबंधनच्या सरकारमध्ये सहभागी सात पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेसचे सध्या दोन मंत्री आहेत. पक्षाची मागणी आहे की, ही संख्या ३ किंवा ४ करावी; परंतु याबाबत अद्याप सहमती झालेली नाही. आता कर्नाटक निवडणुकांचे निकाल येताच काँग्रेस नितीशकुमार सरकारवर दबाव आणणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. म्हणजेच मंत्रिमंडळात काँग्रेसच्या कोट्यातील मंत्र्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, प्रदेश नेतृत्वाने याबाबत आधीच तयारी करून ठेवली आहे. राज्य मंत्रिमंडळात काँग्रेसच्या कोट्यातून आणखी मंत्री केले जातील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश कुमार सिंह यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे.

निवडणुकीबाबत तयारीला वेग-  राज्यात आता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. -  तथापि, काँग्रेसचे नेते याबाबत बोलत नाहीत. -  सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने सुमारे १२ नेत्यांना लढविण्याची तयारी केली आहे. -  यासाठी महागठबंधनमधील सात पक्षांत कसा समन्वय साधला जातो, हे लवकरच कळेल. 

टॅग्स :Biharबिहारcongressकाँग्रेसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक