शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

'इकडे तिकडे जाणार नाही, आता इथेच राहणार', PM मोदींच्या भेटीनंतर नितीश कुमार यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 08:54 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली:  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जेडीयूने पुन्हा एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर आणि बिहारमध्ये भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान मोदींसोबतची ही त्यांची पहिली भेट आहे.

नितीश कुमार यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचीही भेट घेतली. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, भाजपा आणि जेडीयू १९९५ पासून एकत्र आहेत. दरम्यान, ते निश्चितपणे एक दोन वेळा इकडे तिकडे गेले. पण पुन्हा कधीच जाणार नाही. आता इकडे तिकडे जाणार नाही, आता इथेच राहणार....असं नितीश कुमार यांनी सांगितले.

नितीश कुमार २८ जानेवारी रोजी पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले. राजद सोडण्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर ते म्हणाले होते, आम्ही खूप मेहनत करत होतो आणि इतर (आरजेडी) सर्व श्रेय घेत होते. आता नव्या युतीत जात आहोत. राजीनामा दिल्यानंतर काही तासांनी नितीश पुन्हा भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश म्हणाले, 'मी यापूर्वीही त्यांच्यासोबत होतो. आम्ही वेगवेगळ्या वाटांवर चाललो, पण आता आम्ही एकत्र आहोत आणि नेहमीच राहू. मी (एनडीए) जिथे होतो तिथे परत आलो आहे आणि आता कुठेही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्री असताना नितीश यांचा हा चौथा यू-टर्न होता. ऑगस्ट २०२२मध्ये त्यांनी भाजप सोडला. आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत ते पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहार