शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

नोटाबंदी निर्णयाचा किती लोकांना फायदा झाला? -नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 13:28 IST

कोणे एके काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाचे भरभरुन कौतुक करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार याच निर्णयाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत

पाटणा - कोणे एके काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाचे भरभरुन कौतुक करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार याच निर्णयाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. नोटाबंदी निर्णयाचे पुरेपुर समर्थन करणाऱ्या नितीश कुमार यांनी नोटाबंदी निर्णयाच्या अपयशास बँकांना जबाबदार ठरवलं आहे.  बँकांच्या भूमिकेमुळे नोटाबंदी निर्णयाचा योग्य लाभ जनतेला मिळाला नाही, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. 

नितीश कुमार पुढे असंही म्हणाले की, सुरुवातीला मी नोटाबंदी निर्णयाचं समर्थन करत होतो, पण या निर्णयामुळे किती जणांना फायदा झाला?. लोकांनी आपल्याकडील पैसे एका ठिकाणाहून दुसरीकडे जमा केले. देशाच्या प्रगतीमध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची असते. बँकांचं काम फक्त ठेवी आणि कर्ज देणे इतकंच नाही. तर विविध योजना राबवण्यात बँकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे,' असे नितीश कुमार म्हणाले. 

यावेळी त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणांची आवश्यकता असल्याचेही म्हटले.  'सर्वसामान्य लोकांना कर्ज देताना बँका कठोर भूमिकेत असतात. मात्र जे धनाढ्य कर्ज बुडवून पसार होतात त्यांचं काय? आश्चर्यकारक बाब म्हणजे  बँकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हे लक्षात कसे येत नाही?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ''बँकिंग क्षेत्रात सुधारणांची गरज आहे, मी टीका करत नाहीय, फक्त मत व्यक्त करत आहे.देशात विकासासाठी सरकार ज्या निधीची तरतूद करते, त्याच्या योग्यरित्या वाटप करण्यासाठी बँकांना आपली यंत्रणा मजबूत करणं आवश्यक आहे'', असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Note BanनोटाबंदीNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी