शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Bihar Flood: बिहारमधील पुरात बळी गेलेल्यांची संख्या २४ वर; ७५ लाख लोकांना जबर फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 06:49 IST

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची (एनडीआरएफ) ३३ पथके राज्यात तैनात

पाटणा : बिहारात आलेल्या पुरातील बळींची संख्या २४ झाली असून, १६ जिल्ह्यांतील ७५ लाखांपेक्षा अधिक लोकांना पुराचा जबर फटका बसला आहे. बिहार सरकारच्या वतीने अधिकृतरीत्या ही माहिती देण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, दरभंगा जिल्ह्यात १0 जण मृत्युमुखी पडले आहेत. मुजफ्फरपूरमध्ये सहा जण, चंपारनमध्ये चार जण, सरनमध्ये दोन जण आणि सिवानमध्ये दोन जण मृत्युमुखी पडले आहेत. पुराचा तडाखा बसलेल्या लोकांची संख्या ७५,0२,६२१ असल्याचे बिहार सरकारच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. पुराच्या पाण्यात बुडाल्याने हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत, तर ६६ जनावरे दगावली आहेत.सूत्रांनी सांगितले की, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची (एनडीआरएफ) ३३ पथके राज्यात तैनात करण्यात आली आहेत. त्यांचे मदत व सुटका कार्य सुरू असून, आतापर्यंत १२,४७९ लोकांना मदत छावण्यांत हलविण्यात आले आहे.शनिवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. भागलपूर, दरभंगा, पुर्णिया, मुंगेर आणि कोसी विभागांचा त्यांनी हवाई दौरा केला. गंडक बॅरेज काळजीपूर्वक हाताळण्याच्या सूचना नितीशकुमार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कोसी नदीच्या पूर्व कूसबंदीचीही त्यांनी पाहणी केली. तत्पूर्वी, सोमवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या पूर आढावा बैठकीला उपस्थिती लावली होती.