शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

Coronavirus: कोरोनाचे मृत्यू लपवले! राज्यात ९,३७५ जणांनी गमावले प्राण; बिहार सरकारची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 11:24 IST

Coronavirus: बिहार सरकारने राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी दाखवल्याबाबत कबुली देत मोठा खुलासा केला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे राज्यात ९,३७५ जणांनी गमावले प्राणबिहार सरकारची कबुली

पाटणा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा फटका बसला. कोरोनामुळे होणारे मृत्यूही चिंतेत भर टाकणारे होते. नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसह कोरोनामुळे होणारे मृत्यूही नवीन उच्चांक गाठणारे ठरले. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यू लपवले जात असल्याचा आरोप केला जात होता. यातच आता बिहार सरकारने राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी दाखवल्याबाबत कबुली देत मोठा खुलासा केला आहे. बिहारमध्ये कोरोनामुळे तब्बल ९ हजार ३७५ जणांनी आपले प्राण गमावले अशी माहिती मिळाली आहे. (bihar govt itself admitted that deaths due to corona were hidden)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतमुळे बिहारमध्येही मृत्यूंचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात होते. पाटणा उच्च न्यायालयानेही अनेकदा सरकारी आकड्यांवर आक्षेप नोंदवत बिहार सरकारला फटकारले होते. गंगा नदीच्या किनारी मिळणारे मृतदेह आणि अंत्यसंस्कारांचा आकडा यात तफावत असल्याचे सातत्याने म्हटले जात होते. अखेर बिहार सरकारच्या आरोग्य विभानाने यासंदर्भातील कबुली देत मोठा खुलासा केला आहे. 

कोरोनामुळे होणारे मृत्यू लपवले

आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत बिहारमध्ये ५ हजार ४२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. मात्र, सदर आकडेवारी चुकीची असून, वास्तविक पाहता, याच कालावधीत बिहारमध्ये तब्बल ९ हजार ३७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १८ मे रोजी सरकारच्यावतीने कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीबाबत तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी दोन पथकांची स्थापना करण्यात आली होती, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत एका दिवसात सर्वाधिक म्हणजे ६,१४८ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. तर, ९४ हजार ५२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ०१ लाख ५१ हजार ३६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशभरात बुधवारी दिवसभरात ३३ लाख ७९ हजार २६१ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता २४ कोटी २७ लाख २६ हजार ६९३ वर पोहोचली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारState Governmentराज्य सरकारCorona vaccineकोरोनाची लस