शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'थोडी-थोडी पिया करो...IAS-IPS पण रात्री पितात', नितीश कुमारांच्या बिहारमध्ये मांझींची मुक्ताफळे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 15:16 IST

बिहारमध्ये दारुबंदीच्या मुद्द्यावरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मोठं विधान केलं आहे. मांझी यांनी बिहारमध्ये पूर्णपणे दारुबंदीचा दावा फोल ठरवला आहे.

चंपारण-

बिहारमध्ये दारुबंदीच्या मुद्द्यावरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मोठं विधान केलं आहे. मांझी यांनी बिहारमध्ये पूर्णपणे दारुबंदीचा दावा फोल ठरवला आहे. राज्यातील धनाढ्य आणि प्रशासकीय महत्त्वाचे व्यक्ती जसं की आयएएस, आयपीएस, डॉक्टर, इंजिनिअर लोक रात्री मद्यपान करतात, असं जीतनराम मांझी यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

"राज्यातील धनाढ्य आणि बडे लोक मद्यमान करतात हे तर एक ओपन सीक्रेट आहे. ठेकेदार, धनाढ्य, इंजिनिअर, डॉक्टर, आयपीएस, आयएएस हे सर्वजण रात्री १० नंतर मर्यादित स्वरुपात मद्यपान करतात. पण इतरांना ते मद्यपान करतात याची कोणतीही माहिती नसते", असं वक्तव्य जीतनराम मांझी यांनी केलं आहे. 

मद्यपानाबाबत बोलताना गरिबांना सल्ला देण्याचीही मुक्ताफळं मांझी यांनी यावेळी उधळली. "दारु पिऊन कशाला इथंतिथं पडता. जसे बडे लोक मर्यादित स्वरुपात पितात तशी प्या. तुम्हाला पकडून तुमच्यावर कारवाई करण्याची गोष्ट यासाठी होते कारण तुम्ही अमर्याद मद्यपान करुन चौका-चौकात फिरू लागता आणि धिंगाणा घालता. त्यामुळे बड्या लोकांकडून काहीतरी शिका. रात्री प्यायची असेल तर प्या आणि शांत झोपून जा. सकाळी उठून कामाला लागा", असंही जीतनराम मांझी म्हणाले. 

दरम्यान, बिहारमध्ये सध्या दारुबंदीच्या मुद्द्यावरुन मोठं राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याआधीच राज्य सरकार कोणत्याही पद्धतीनं दारुबंदीच्या नियमात बदल करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याउलट दारुबंदी कायद्यात आणखी कठोर पावलं उचलण्याची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. नितीश कुमार यांच्या याच वक्तव्यानंतर आता माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचं हे नवं विधान समोर आलं आहे. 

जीतनराम मांझीच नव्हे, तर बिहारमधील मद्यविक्री आणि मद्यपानाची आकडेवारीच पोलखोल करणारी आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ते आतापर्यंत राज्यात ३ लाख २५ हजार ८७८ लीटर दारु जप्त झाली आहे. याशिवाय ११ हजारहून अधिक जणांना अटक झाली आहे. त्यामुळे राज्यात दारुबंदी असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात दारू उपलब्ध कशी होते असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारalcohol prohibition actदारुबंदी कायदा