शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

या ठिकाणी मतदारांची मतदानाकडे फिरवली पाठ, पहिल्या ५ तासांत पडलं नाही एकही मत, समोर आलं असं कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 14:05 IST

Bihar Lok Sabha Election 2024: देशातील एका मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत एकाही मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला नाही. येथे मतदारांनी मतदान न करण्यााबाबत धक्कादायक कारण समोर आलं आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज आज देशभरात सुरू आहे. देशातील २१ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. कडाक्याचा उन्हातही मतदार ठिकठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. मात्र अशा परिस्थितीत देशातील एका मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत एकाही मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला नाही. येथे मतदारांनी मतदान न करण्यााबाबत धक्कादायक कारण समोर आलं आहे.

बिहारमधील लोकसभेच्या चार जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यापैकी जमुई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मुंगेर जिल्ह्यातील प्राथमिक विद्यालय, गयाघाट मतदान केंद्र -२५८ येथे दुपारी १२ वाजेपर्यंत एकही मत पडलेलं नाही. येथील एकाही मतदाराने आपल्या मताधिकाराचा हक्क बजावलेला नाही. हे मतदान केंद्र गावापासून २०-२५ किमी दूर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत कडक उन्हाळा आणि लांबचं अंतर यामुळे येथील मतदार मतदान करण्यासाठी पोहोचलेले नाहीत. मात्र पुढच्या काही काळात मतदार येथे मतदानासाठी येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने नक्षल प्रभावित ५ मतदान केंद्रांना नक्षल प्रभावित भागाच्या बाहेर स्थापित केले आहे. त्यामुळे भीमबांध जंगलात असलेल्या वनविभागाच्या विश्रांतीगृहात असलेलं मतदान केंद्र तिथून हटवून २५ किमी दूर अंतरावर असलेल्या जमुई-खडगपूर मुख्य मार्गावर असलेल्या प्राथमिक शाळेत हलवण्यात आलं आहे. येथे मतदारांची एकूण संख्या ही ४१९ आहे. मात्र अंतर लांब असल्याने येथील मतदार मतदान करण्यासाठी जाण्यास फारसे उत्सूक नसल्याचे दिसत आहेत.  

टॅग्स :bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४