शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 19:24 IST

Bihar Lok Saha Election : बिहारमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी मुस्लिम आरक्षणवरुन आरजेडी आणि काँग्रेसला लक्ष्य केलं होतं.

Tejashwi Yadav slams PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलावर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी एनडीएचे उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्या समर्थनार्थ करकटमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी बिहारमधील गरिबांना लुटणारा राजा किंवा राजपुत्र कितीही मोठा असला तरी त्याला तुरुंगात जाऊन तुरुंगाची भाकरी खावीच लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ही एनडीए सरकार आणि मोदींची हमी आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावर आता तेजस्वी यादव यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं.

जमीन-नोकरी घोटाळा प्रकरणात लालू-तेजस्वी यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी यादव कुटुंबावर निशाणा साधला. त्यांनी गरिबांची लूट केली आणि नोकरीच्या बदल्यात त्यांच्या जमिनी घेतल्या. त्यांनी आता कान उघडून ऐकावं की त्यांच्या तुरुंगात जाण्याची वेळ सुरू झाली आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्याची वेळ संपताच तुरुंगात जाण्याचा मार्ग ठरवावा लागेल. बिहारची लूट करणाऱ्यांना एनडीए सरकार सोडणार नाही, असाही इशारा मोदींनी दिला.

याआधी पाटलीपुत्र येथे झालेल्या सभेतही नरेंद्र मोदींनीं मुस्लिम आरक्षणावरून आरजेडी आणि काँग्रेसला धारेवर धरलं होतं. बिहारमधील अतिमागास, ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमातीच्या कुटुंबांना मी हमी देतो की जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचे हक्क हिरावून घेऊ देणार नाहीत. मोदींसाठी संविधान सर्वोपरि आहे. इंडीया आघाडीला व्होटबँकेची गुलामगिरी करायची असेल किंवा तिथे जाऊन मुजरा करायचा असेल तर करा. पण मी अनुसूचित जाती आणि जमातीच्या, ओबीसी आरक्षणाच्या पाठीशी उभा आहे आणि उभा राहीन, असे मोदी म्हणाले.

मोदींनी केलेल्या टीकेला आता तेजस्वी यादव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. गुजरातमध्ये २५ मुस्लिम जातींना आरक्षण मिळाले आहे. मोदी तिथे १३ वर्षे मुख्यमंत्री होते, त्यांना हे माहीत नाही का? यावर ते का बोलत नाहीत?, असा सवाल तेजस्वी यादव यांनी केलाय.

"पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यघटनेचे मूलभूत ज्ञानही नाही. संपूर्ण देशात जातीय जनगणना करण्यासाठी आम्ही पंतप्रधानांना पाच वेळा पत्रे लिहिली. बिहारचे शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेले पण त्यांनी नकार दिला. पंतप्रधान मोदींनी आपली भाषा सुधारली पाहिजे आणि संविधानाचे मूलभूत ज्ञानही समजून घेतले पाहिजे," असाही टोला तेजस्वी यादव यांनी लगावला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Tejashwi Yadavतेजस्वी यादवNarendra Modiनरेंद्र मोदीbihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४