शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Misa Bharti : "भाजपाचे सर्व मंत्री तुरुंगात जातील, मी असं बोललेच नाही"; मीसा भारती यांनी मारली पलटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:59 IST

Misa Bharti : मीसा भारती यांनी आपलं विधान आता मागे घेतलं आहे. जर चौकशी झाली तर पंतप्रधानांसह अनेक केंद्रीय मंत्री जेलमध्ये जातील असं त्या म्हणाल्या होत्या. पण त्यांनी आता पलटी मारली आहे.

पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील आरजेडीच्या उमेदवार मीसा भारती यांनी आपलं विधान आता मागे घेतलं आहे. जर चौकशी झाली तर पंतप्रधानांसह अनेक केंद्रीय मंत्री जेलमध्ये जातील असं त्या म्हणाल्या होत्या. पण त्यांनी आता पलटी मारली आहे. माझ्या या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मीडियाने माझं पूर्ण विधान दाखवावं असं म्हटलं आहे. 

आरजेडीच्या उमेदवार मीसा भारती म्हणाल्या की, "भविष्यात जर इलेक्टोरल बाँडची चौकशी झाली तर नक्कीच कारवाई केली जाईल, असं आम्ही सांगितलं होतं. मीडिया अजेंडा ठरवू शकत नाही. पक्ष आणि विरोधी पक्षांनी अजेंडा सेट केला पाहिजे आणि मीडिया ज्या प्रकारे अजेंडा ठरवत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. जेलमध्ये जातील असं आम्ही म्हटलं नाही."

"जर चौकशी झाली तर पाहू असं आम्ही म्हटलं होतं. मीडियाने हे चुकीच्या पद्धतीने दाखवलं आहे." आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी नुकतंच एक मोठं विधान केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी इलेक्टोरल बाँड्सवर प्रश्न उपस्थित केले होते आणि हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटलं होतं. 

चौकशी झाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे सर्व नेते तुरुंगात जातील, असंही मीसा भारती यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली. तसेच भाजपाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता मीसा भारती यांनी मी असं म्हटलंच नाही, मीडियाने माझ्या विधानाचा विपर्यास केला, जे योग्य नाही असं सांगितलं आहे.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा