शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

Bihar Political Crisis: नितीश कुमार मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री; बिहारमध्ये सत्तांतर अटळ..?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 1:32 PM

Bihar Political Crisis: बिहारमधील नव्या सरकारची रूपरेषा ठरली असून फक्त औपचारिकता बाकी आहे. उपमुख्यमंत्रिपदासह गृहखातेही तेजस्वी यांच्याकडे जाणार आहे.

Bihar Political Crisis:बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. जदयूचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने हा एक संकेत समजला जात आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलू शकतात. जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार व राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यात नव्या सरकारच्या गठनाबाबत चर्चाही झालेली आहे. चर्चेत बिहारमधील नव्या सरकारची रूपरेषाही निश्चित करण्यात आली आहे. सध्या दोन्ही पक्षांचे प्रमुख नेत्यांमध्येच ही चर्चा सुरू आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास सहमती दर्शवली आहे. तर, ते स्वतः उपमुख्यमंत्रिपदासह आणि गृहखातं स्वतःकडे ठेवणार आहेत. यासोबतच सभागृहात राजदचा स्पीकर असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तेजस्वी यादव यांच्याकडेच सर्व अधिकार देण्यात आले आहेत. तसेच, लालूप्रसाद यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला जात आहे. राजदचे इतर बडे नेते अप्रत्यक्षपणे लक्ष ठेवून आहेत पण त्यांना बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीपासून दूर ठेवले जात आहे. आरजेडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास तयार झाले आहेत. तसेच, ते स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतील, पण नितीश कुमार यांना गृहखाते तेजस्वीकडे सोपवावे लागणार आहे.

नितीश कुमारांचे भाजपपासून अंतर नितीश कुमार नेहमीच गृहखाते आपल्याकडे ठेवत असतात, पण यावेळी सरकार स्थापनेच्या अटींमध्ये तेजस्वी यादवच गृहखाते सांभाळतील. इतकंच नाही तर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सभापतीपद आरजेडीच्या वाट्याला जाईल. साहजिकच, मुख्यमंत्रिपद देण्याच्या बदल्यात, नवीन सरकारमधील आपली भागीदारी महत्त्वाची राहावी म्हणून राजद दोन मोठी पदे आपल्या बाजूला ठेवत आहे. विशेष म्हणजे, नितीश यांनी फक्त काही ठराविक मुद्द्यांवरच नव्हे तर अनेक प्रसंगी भाजपपासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. सुमारे महिनाभरापूर्वी नितीश कुमार यांनी पन्नास मिनिटांहून अधिक काळ जात जनगणनेच्या मुद्द्यावर तेजस्वी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर तेजस्वी यादव यांचा नितीश कुमार यांच्याबाबतचा सूर बदलताना दिसू लागला.

जेडीयू भाजपपासून दुरावलेजात जनगणना हे एकमेव हत्यार आहे, ज्याच्या मदतीने जेडीयू आणि आरजेडी आगामी काळात भाजपला घेरण्याचा प्रयत्न करतील. जेडीयू अनेक प्रसंगी भाजपपासून दूर राहण्याचे प्रयत्न करत आहे. अग्निवीरच्या मुद्द्यावरून जेडीयूने आरजेडीच्या विध्वंस कार्यक्रमाला उशीर रोखले आणि केंद्र सरकारकडे अग्निवीर योजनेचा आढावा घेण्याची मागणी केली. इतकेच नाही तर लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर नितीश कुमार यांचा सूर वेगळा ऐकायला मिळाला. काल म्हणजेच रविवारी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ​​लालन सिंह यांनी महागाईवर केंद्र सरकारच्या विरोधात भाष्य केले होते. त्यामुळेच आगामी काळात जेडीयूचा राजकीय मार्ग वेगळा होणार असल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपा