शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

भाजपासाठी धोक्याची घंटा?; बिहारमध्ये पुढील २४ तास महत्त्वाचे, नितीश कुमारांनी वाढवलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:53 IST

बिहारमधील राजकीय घडामोडींवर सर्वच पक्षांच्या नजरा आहेत. जेडीयू, आरजेडी आमदार-खासदारांची बैठक उद्या होणार आहे.

पटना - बिहारच्या राजकारणासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे मानले जात आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडण्याच्या चर्चेमुळे सर्वच पक्षाने स्वत:ची रणनीती बनवली आहे. मंगळवारी नितीश कुमार यांनी जेडीयूच्या सर्व खासदार, आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांसाठी बैठक बोलावली आहे. तर आरजेडीनेही आमदार-खासदारांना बैठकीसाठी बोलावलं आहे. काँग्रेसनंही त्यांच्या आमदारांना पटनात राहण्यास सांगितले आहे. तर जीतन राम मांझी यांनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. 

बिहारच्या राजकीय घडामोडीला वेग आला आहे. नितीश कुमार भाजपाशी युती तोडू शकतात आणि आरजेडी, काँग्रेस आणि डाव्यांना सोबत घेत नवीन सरकारची स्थापना करू शकतात असं बोललं जात आहे. पुढील २४ तास बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एनडीएसाठी संकट उभं राहिले आहे. ज्याप्रकारे नितीश कुमार यांनी भाजपाशी अंतर ठेवले आहे ते पाहता नितीश कुमार काहीतरी मोठं पाऊल उचलणार असल्याचं बोलले जात आहे. नितीश कुमारांचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी बोलणं झालं आहे. ११ ऑगस्टपर्यंत या दोन्ही नेत्यांची भेट होण्याचीही शक्यता आहे. परंतु अद्याप याला पुष्टी मिळाली नाही. 

बिहारमधील राजकीय घडामोडींवर सर्वच पक्षांच्या नजरा आहेत. जेडीयू, आरजेडी आमदार-खासदारांची बैठक उद्या होणार आहे. भाजपानं सध्या वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. राजकीय घडामोडीत एनडीए सरकार व्यवस्थित सुरु आहे. सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा दावा भाजपा नेते करत आहेत. २०१४ लोकसभा आणि २०२५ च्या विधानसभेसाठी तयारीला लागा असं भाजपा आमदारांना कळवण्यात आलं आहे. नितीश कुमारांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाईल असं भाजपानं म्हटलं आहे. 

नितीश कुमारांना बनायचंय पंतप्रधान?राज्यात भाजपासोबत युती तुटली नाही तरीही जेडीयू नेते नितीश कुमार पंतप्रधानपदाचा चेहरा असतील असा दावा करत आहेत. जेडीयूचे महासचिव अली अशरफ फातमी यांनी म्हटलंय की, देशाच्या पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार यांच्यापेक्षा मोठा नेता कुणी नाही. तर दुसरीकडे वीआयपी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री मुकेश सहानी यांनी नितीश कुमार जर महाआघाडीत सहभागी झाले तर केवळ मुख्यमंत्रिपदासाठी जाणार नाहीत. जेव्हा त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले जाईल तेव्हाच जातील असं सांगितले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा