'भाजपने भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले', अखिलेश यादव यांची शेलक्या शब्दात टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 08:06 PM2024-01-28T20:06:39+5:302024-01-28T20:06:49+5:30

नितीश कुमार यांनी एनडीओसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे विविध पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Bihar Politics, Akhilesh Yadav criticizes nitish kumar, says 'BJP blocked the future prime minister only on the post of chief minister' | 'भाजपने भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले', अखिलेश यादव यांची शेलक्या शब्दात टीका

'भाजपने भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले', अखिलेश यादव यांची शेलक्या शब्दात टीका

Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेतली असून, एनडीएसोबत बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन केले आहे. आतापर्यंत राजदसोबत सरकार चालवणारे नितीश कुमार आता भाजपसोबत सरकार चालवतील. त्यांच्या या कृत्यामुळे इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अखिलेश यादव म्हणाले की, भाजपने षडयंत्र रचून भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले. भाजपने बिहारच्या जनतेचा आणि जनमताचाही अपमान केला आहे. या अपमानाला जनता लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून प्रत्युत्तर देईल. बिहारचा प्रत्येक रहिवासी बिहारची इज्जत वाचवण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी पुढील मतदान करेल.

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की, देशात 'आया राम-गया राम' असे अनेक लोक आहेत. पूर्वी ते आणि आम्ही एकत्र लढत होतो. मी लालूजी आणि तेजस्वी यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनीही नितीश जात असल्याचे सांगितले. त्यांना राहायचे असते तर ते राहिले असते, पण त्यांना जायचे होते. आम्हाला हे आधीच माहीत होते, पण इंडिया आघाडी अबाधित ठेवण्यासाठी आम्ही काहीही बोललो नाही. आम्ही काही चुकीचे बोललो तर चुकीचा संदेश गेला असता. 

शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी नितीश यांच्यावर हल्लाबोल करत 'अयोध्येत राम आणि बिहारमध्ये पलटूराम' असे म्हटले. नितीश हे मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगून राऊत म्हणाले की, इंडिया आघाडी सुस्थितीत आहे. ममता बॅनर्जी अजून बाहेर गेल्या नाहीत. आम आदमी पक्षही वेगळा झालेला नाही. काँग्रेस, तेजस्वी यादव आणि इतर छोटे पक्ष आमच्यासोबत आहेत. नितीश कुमार आमच्यापासून दूर गेल्याने बिहारच्या राजकारणात काही फरक पडणार नाही. 

आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले की, नितीश कुमार हे थकलेले मुख्यमंत्री होते, आम्ही त्यांच्याकडून कामे करुन घेतली. तरुणांना नोकऱ्या देण्याचे आमचे व्हिजन होते. बिहारमध्ये 17 महिन्यांत ऐतिहासिक कामे झाली. आम्ही आघाडीचे तत्व पाळले. हा खेळ अजून संपलेला नाही, जेडीयू 2024 मध्ये संपणार, अशी टीका त्यांनी केली. 

 

Web Title: Bihar Politics, Akhilesh Yadav criticizes nitish kumar, says 'BJP blocked the future prime minister only on the post of chief minister'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.