शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

बिहारच्या राजकारणात ४ जूननंतर उलथापालथ होणार; नितीशकुमार पुन्हा मोठा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:38 IST

तेजस्वी यादव यांनी केलाय दावा; पक्षाला वाचविण्याचा प्रयत्न

एसपी सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बिहारच्या राजकारणात ४ जूननंतर पुन्हा मोठी उलथापालथ होऊ शकते. आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी ते हा निर्णय घेणार आहेत, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. जेव्हा आरक्षण लागू झाले तेव्हा हे लोक शिवीगाळ करायचे. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, म्हणूनच भाजपला संविधानाचा तिरस्कार आहे, असे ते म्हणाले.

लेकीसाठी लालू यादव उतरले प्रचारात

सातव्या टप्प्यात बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा जागेसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. अशा स्थितीत राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासाठी पाटलीपुत्र ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. येथे लालू यादव यांनी त्यांची मोठी मुलगी मीसा भारती यांना उमेदवारी दिली आहे. मीसा भारती यांचा विजय निश्चित करण्यासाठी लालू यादव यांनी स्वतः प्रचाराला सुरुवात केली आहे. लालू यादव मंगळवारी मीसा यांच्यासाठी मते मागण्यासाठी बाहेर पडले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठे भाकीत केले.

४ जून रोजी इंडियाचे सरकार येणार

नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद जाणे निश्चित असल्याचे लालू यादव म्हणाले. ते म्हणाले की, देशात ४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. आम्ही अवतार आहोत, असे मोदी सांगत आहेत, पण ४ जून रोजी निकालानंतर नेमके काय ते कळेल.

दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडलेले लालू यादव आज मुस्लीम समाजाची सर्वांत मोठी इमारत शरिया येथे पोहोचले. यावेळी खानकाहमध्ये लालू यादव आणि पीर साहेब यांच्यात दीर्घ संवाद झाला. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही.

 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादव