शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

रेल्वेचा भीषण अपघात, २१ डब्बे घसरले, ६ मृत्यू १०० जखमी; रेल्वेमंत्री मध्यरात्रीच घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 8:32 AM

आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे तब्बल २१ डबे बुधवारी रात्री ९.३५ वाजता दानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ रुळावरून घसरले.

Bihar Railway Derail: आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या (१२५०६) नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे काही डबे बुधवारी रात्री बिहारमधील बक्सरजवळ रुळावरून घसरले. या अपघातात अनेक ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनीही रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी केली. यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी अपडेट माहितीही शेअर केली आहे.  

आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे तब्बल २१ डबे बुधवारी रात्री ९.३५ वाजता दानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ रुळावरून घसरले. या अपघाताचे वृत्त कळताच वैद्यकीय पथक आणि अधिकाऱ्यांसह अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झाले आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनीही तात्काळ यंत्रणा कामाला लावली. तसेच, स्वत:ही घटनास्थळाचा दौरा केला. या अपघातानंतर ट्रेनमधील प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनने पुढे पाठविण्यात आले आहे. तर, पुढील काही वेळातच हा रेल्वेमार्ग सुरळीत होईल, अशी माहितीही रेल्वेमंत्र्यांनी ट्विटरवरुन दिली आहे. 

रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबाप्रती रेल्वेमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. तसेच, घटनेची सखोल तपासणी करण्यात येईल, असेही म्हटले.  दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही ट्विटरवरुन रेल्वे दुर्घटनेची माहिती देताना मदत व बचावकार्य वेगात सुरू असल्याचे सांगितले. तसेच, SDRF पथक घटनास्थळी पोहोचले असून वेगाने मदतकार्य सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. त्यासाठी, त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओही रात्रीच शेअर केले आहेत.  

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, एसी बोगीतील सर्व प्रवासी जवळपास झोपले होते, तेव्हा अचानक ट्रेनला धक्का लागला. प्रत्येकजण आपापल्या जागेवरुन खाली पडू लागला. सुमारे १० ते १५ मिनिटे ट्रेनमध्ये जोरदार हादरे बसले. कोणाला काही समजेपर्यंत ट्रेनच्या सर्व २१ बोगी रुळावरून घसरल्या होत्या. दोन बोगी उलटल्या होत्या.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातministerमंत्रीBiharबिहारAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव