शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बिहारमध्ये रस्त्यावरील नमाज पठण बंद होणार?, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 11:34 IST

एखादा व्यक्ती कोठे पूजा-आरती करतो, गाणे गातो ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. सर्वांचे स्वतंत्र विचार आहेत, त्यामुळेच सर्वांनी आपल्या पद्धतीने अनुकरण करावे हे मी मानतो

ठळक मुद्देओमायक्रॉन विषाणूचा अद्याप एकही रुग्ण बिहारमध्ये आढळून आलेला नाही. मात्र, ओमायक्रॉनचा धोका कायम आहे, त्यामुळेच उपाय आणि खबरदारी घेण्यात येत आहे

पाटणा - बिहारच्या राज्य मंत्रीमंडळातील एका भाजप नेत्याने रस्त्यावरील नमाज पठण बंद करण्याचा मागणीचे समर्थन केले होते. त्यावरुन, मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना, या गोष्टी निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, या विषयाला मुद्दा बनवण्यात काहीही अर्थ नाही. आमच्यासाठी सर्वच नागरिक एकसमान आहेत. सर्वांनी आपल्या पद्धतीने या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात, असेही कुमार यांनी स्पष्ट केलं. 

एखादा व्यक्ती कोठे पूजा-आरती करतो, गाणे गातो ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. सर्वांचे स्वतंत्र विचार आहेत, त्यामुळेच सर्वांनी आपल्या पद्धतीने अनुकरण करावे हे मी मानतो. जेव्हा कोरोना काळात सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, तेव्हा सर्वच लोकं घरात होती. कुणीही रस्त्यावर नव्हते. आता, पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे, सरकारने नवी नियमावली जारी केल्यास सर्वांना ते नियम लागू राहतील. हा कुठल्याही एका धर्माचा विषय नाही, असे स्पष्टीकरण नितीश कुमार यांनी दिले आहे. 

ओमायक्रॉन विषाणूचा अद्याप एकही रुग्ण बिहारमध्ये आढळून आलेला नाही. मात्र, ओमायक्रॉनचा धोका कायम आहे, त्यामुळेच उपाय आणि खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या ओमायक्रॉन रुग्णाची पडताळणी होण्यास 5 ते 7 दिवसांचा कालावधी लागतो. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे, बिहारमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांचा ओमायक्रॉन संबंधित अहवाल लवकरात लवकर प्राप्त व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नितीश कुमार यांनी जनता दरबारात उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी, कोरोना आणि ओमायक्रॉनबाबतही माहिती दिली. दरम्यान, सध्या पाटणा येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे.  

टॅग्स :BiharबिहारMuslimमुस्लीमNamajनमाजNitish Kumarनितीश कुमार