शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

बिहारमध्ये दिवाळीपूर्वी निवडणुकीचा बार

By admin | Published: September 10, 2015 4:50 AM

बिहार विधानसभेची निवडणूक दिवाळीपूर्वी पाच टप्प्यांत पार पाडली जाणार असून, ८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने नवे सरकार ऐन दिवाळीत सत्तेवर येईल.

नवी दिल्ली : बिहार विधानसभेची निवडणूक दिवाळीपूर्वी पाच टप्प्यांत पार पाडली जाणार असून, ८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने नवे सरकार ऐन दिवाळीत सत्तेवर येईल. २४३ सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान १२ आॅक्टोबर रोजी सुरू होणार असून, अंतिम टप्पा ५ नोव्हेंबर रोजी पूर्ण होईल.१२ आॅक्टोबर, १६ आॅक्टोबर, २८ आॅक्टोबर, १ नोव्हेंबर आणि ५ नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी बुधवारी पत्रपरिषदेत जाहीर केले. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपणार असल्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया १२ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. दसरा, ईद, मोहरम, छटपूजा निवडणूक निकालाला लागूनच दिवाळी यासारखे महत्त्वाचे सण या काळात असल्यामुळे त्यांनी जातीय सलोखा आणि शांतता राखण्याची खबरदारी आयोग घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्यासोबत आयुक्त अचलकुमार ज्योती आणि ओमप्रकाश रावत हे होते. बिहारमध्ये ४७ मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्यामुळे पुरेसा सुरक्षा बंदोबस्त ठेवला जाईल, असे त्यांनी सांगितले.साऱ्या देशाचे लक्षभाजपप्रणित रालोआ आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील धर्मनिरपेक्ष महायुती यांच्यातील काट्याच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले राहील. काँग्रेसने यावेळी प्रथमच लालूप्रसाद यादव यांच्या राजदसह जेडीयूसोबत हातमिळविणी केली आहे. दुसरीकडे रालोआला पासवानांचा लोकजनशक्ती, माझी मुख्यमंत्री जितीन मांझी यांच्या गटाची साथ लाभली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेत नितीशकुमार यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकल्यामुळे राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. ही निवडणूक दोन्ही आघाड्यांनी प्रतिष्ठेची बनविल्यामुळे जय-पराजयाचे श्रेय- अपश्रेय हाही निवडणुकीनंतर गाजणारा मुद्दा ठरू शकतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर या निमित्ताने मोदींची कसोटी लागणार आहे. भूंपादन विधेयकावर घ्यावी लागलेली माघार, जीएसटीसारख्या आर्थिक सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेले अपयश या सर्वांवर मात करतानाच मोदी सरकारची गतिशीलता कायम राखण्यासाठी भाजपला कोणत्याही परिस्थितीत विजय खेचून आणायचा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)यंत्रांवर उमेदवारांचे फोटोबिहारमधील ६.६८ कोटी मतदार ६२,७७९ मतदान केंद्रांवर मतदानाचा अधिकार बजावतील. यावेळी प्रथमच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनवर उमेदवारांचे फोटो लागलेले राहतील.नितीश, लालू म्हणतात आमची ‘जय्यत तयारी’आम्ही निवडणुकीची चांगली तयारी केली आहे, असे सांगत मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी निवडणूक कार्यक्रमाचे स्वागत केले. आचारसंहिता लागू होत असल्याने निवडणुकीसंबंधी कोणतेही कामकाज केले जाणार नाही; केवळ अत्यावश्यक कार्यालयीन कामे पार पाडली जातील, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. पाच टप्प्यांत निवडणुका घेण्याऐवजी एकाच दिवशी पार पाडल्या असत्या तर चांगले झाले असते, असे लालूप्रसाद यांनी म्हटले. ही केवळ बिहारची नव्हे तर संपूर्ण देशाची निवडणूक आहे, असेही ते म्हणाले.निवडणूक कार्यक्रमाची घोषणा ही नितीशकुमार राजवटीचा शेवट झाल्याची घोषणा आहे. आता प्रतीक्षा संपली असून, भाजपा सत्तेवर येत असल्याची ही घोषणा आहे.-शाहनवाज हुसैन, प्रवक्ते, भाजपादिवाळीपूर्वी निकाल होणार ही आनंदाची गोष्ट आहे. बिहारची जनता लोक चांगल्या प्रशासनाबाबत आश्वस्त होऊन दिवाळी साजरी करतील.- रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री