शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

आयडियाची कल्पना! 'या' गावात कचऱ्यापासून तयार केली जाते वीज; मोदींनींही केलंय भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 12:25 IST

Electricity from waste material : घरातला कचरा वाया जात नाही तर वीज निर्मितीसाठी मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनीही या गावच्या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे.

नवी दिल्ली - तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील कांजीरंगल गावात वेस्टेज (Waste Material) पासून म्हणजेच कचऱ्यापासून वीजनिर्मिती (Power Generation) केली जात आहे. ऑगस्टमध्ये मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या गावाचे कौतुक केलं होतं. एएनआयने दिलेल्या रिपोर्टनुसार,या गावात कचऱ्यापासून वीज तयार होते. घरातला कचरा वाया जात नाही तर वीज निर्मितीसाठी मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनीही या गावच्या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे.

तामिळनाडू राज्यातील कांजीरंगल गावात स्थानिक लोक आणि पंचायतींच्या मदतीने एनआरयूएम (NRUM) अंतर्गत उभारण्यात आलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पापासून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जात आहे अशी माहिती शिवगंगाचे डीसी थिरू पी मधुसूद रेड्डी यांनी दिली आहे. हॉटेल आणि घरांमधून निघणाऱ्या ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर या प्लांटमध्ये प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाते. यातून  निर्माण केलेल्या वीजेचा वापर हा शेतीसाठी आणि इतर कामांसाठी केला जात आहे.

कचऱ्यापासून होतेय वीजनिर्मिती

रेड्डी यांनी या प्लांटची क्षमता 2 टन आहे, सध्या दररोज 1.2/1.3 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते अशी माहिती दिली आहे. त्यामुळे यातून निर्माण होणाऱ्या वीजेतून शेतीतील वीज वापरासह शेजारील परिसरात 200 रस्त्यांवरील दिवे लावण्यात आले आहेत. इतर जिल्ह्यांमध्येही असे प्लांट उभारण्याची मागणी आता होऊ लागली आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जात असल्याने या गावातील प्रकल्पाचं आणि लोकांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूIndiaभारतelectricityवीज