शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आणीबाणीचा बिर्ला यांनी दिलेला संदर्भ राजकीय; विरोधी पक्षनेते राहुल गांधींची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 09:20 IST

देशात १९७५ साली लादलेल्या आणीबाणीचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या भाषणात दिलेला संदर्भ राजकीय स्वरूपाचा होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात १९७५ साली लादलेल्या आणीबाणीचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या भाषणात दिलेला संदर्भ राजकीय स्वरूपाचा होता. तो उल्लेख टाळता आला असता, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी बिर्ला यांची संसद भवनात भेट घेऊन त्यांना सांगितले व आपली नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाल्याची ओम बिर्ला यांनी घोषणा केली. त्यानंतर गांधी यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. 

आणीबाणीचा विषय संसदेत उपस्थित झाला होता. त्याबद्दल या भेटीत चर्चा झाली का, या प्रश्नावर वेणुगोपाल म्हणाले की, संसदेच्या कामकाजासंदर्भातील अनेक गोष्टींवर आम्ही लोकसभा अध्यक्षांशी चर्चा केली. त्यात आणीबाणीचाही मुद्दा होता. लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांनी एक ठराव सभागृहात मांडला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू केली. हा राज्यघटनेवर हल्ला होता. त्याचा आम्ही निषेध करतो, असे या ठरावात म्हटले होते.

काय म्हटले ठरावात? केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने आणीबाणी लागू करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकले, प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादले, न्याययंत्रणेच्या स्वायत्ततेवर गदा आणली असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात मांडलेल्या  ठरावात म्हटले होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा