शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

अनौरस मुलांनाही जन्मदाखला

By admin | Published: July 07, 2015 3:34 AM

अविवाहित मातांना त्यांच्या अपत्याचा जन्मदाखला पित्याच्या नावाचा उल्लेख न करता दिला जावा, असा ऐतिहासिक आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली : पितृत्वाबद्दल शंका असली तरी मातृत्व हे निसर्गाचे संशयातीत वास्तव असल्याने यापुढे अविवाहित मातांना त्यांच्या अपत्याचा जन्मदाखला पित्याच्या नावाचा उल्लेख न करता दिला जावा, असा ऐतिहासिक आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी देशातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिला.कायद्याने गतिशील राहून बदलत्या सामाजिक परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या कूटप्रश्नांतून मार्ग काढायला हवा, यावर भर देत न्या. विक्रमजीत सेन आणि न्या. अभय मनोहर सप्रे यांनी असा आदेश दिला, की अविवाहित महिलेने अपत्याच्या जन्मदाखल्यासाठी अर्ज केल्यास तिच्याकडून फक्त ते अपत्य तिच्याच पोटी जन्माला आल्याचे प्रतिज्ञापत्र घेऊन तिला तसा दाखला दिला जावा.न्यायालय म्हणते, की अशा लग्नाशिवाय झालेल्या मुलाचे कायदेशीर पालकत्व (गार्डियनशिप) न्यायालयाकडून मिळविले की आपल्याला त्या मुलाचा जन्मदाखलाही आपोआप मिळेलच, असा सर्वसारण गैरसमज आहे. अशा मुलांना शाळेत प्रवेश घेताना किंवा त्यांचा पासपोर्ट काढताना पित्याचे नाव देण्याची गरज नसली तरी यासाठी जन्मदाखला हा द्यावाच लागतो. प्रत्येक नागरिकाच्या जन्माची नोंद ठेवणे हे सरकारचे कर्तव्य आहे व म्हणूनच कायदेशीर अडचणीमुळे अथवा निष्काळजीपणाने जन्मदात्याने जन्माची नोद केली नाही म्हणून कोणालाही अडचण येणार नाही याची खात्री करणे, ही सरकारची जबाबदारी ठरते.खरेतर न्यायालयापुढील प्रकरण भारतातील ख्रिश्चनांना लागू असलेल्या ‘गार्डियनशिप अँड वॉडर्््स अ‍ॅक्ट’शी संबंधित होते व त्यात मुलाचा दोनपैकी एक पालक दुसऱ्याला रीतसर नोटीस न देता स्वत:ला त्या मुलाचा ‘गार्डियन’ नेमून घेऊ शकतो का, असा त्यात मुद्दा होता. परंतु जन्मदाखल्यासंबंधीचा हा आदेश आपण त्या पलीकडे जाऊन सर्वांसाठी देत आहोत, असे न्यायालयाने आवर्जून स्पष्ट केले.मात्र कलम ११ चा नेमका अर्थ लावताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मुलाच्या दोन पालकांखेरीज अन्य कोणी ‘गार्डियनशिप’साठी अर्ज केला असेल तरच मुलाच्या नैसर्गिक पालकांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे ठरते. तसेच खास करून अविवाहित मातेने असा अर्ज केला असेल व ती एकटीच अपत्याचे पालनपोषण करीत असेल तर ज्याने मुलाकडे मुळातच पूर्ण दुर्लक्ष केले आहे अशा पित्याचे म्हणणे एकून घेण्याची गरजही नाही. अर्थात न्यायालयाकडून सोपविली जाणारी ‘गार्डियनशिप’ कायमसाठी नसते व व पित्यासह इतरही कोणाचा त्यास आक्षेप असेल तर ते न्यायालयात भविष्यातही अर्ज करून ते रद्द करून घेऊ शकतात. (विशेष प्रतिनिधी)आई हीच नैसर्गिक पालकजगभरातील कायद्यांचा आढावा घेऊन न्यायालय म्हणते, की भारतात निदान हिंदू अविवाहित मातांना तरी त्यांच्या मुलांचे नैसर्गिक पालक मानले गेले आहे. समान नागरी कायदा लागू झाला नसला तरी ख्रिश्चन अविवाहित मातांनाही हा अधिकार नाकारण्याचे कारण दिसत नाही. एकदा मातृत्वाला मान्यता दिली की पितृत्व निश्चित करण्याचीही गरज नाही. ज्यांना पित्याने ओळखही न देता वाऱ्यावर सोडून दिले आहे, अशा अविवाहित मातांच्या मुलांच्या बाबतीत पित्याला कायदेशीर मान्यता देणे हा निरर्थक उद्योग ठरेल. आज अशा मुलांना एकट्याच्या हिमतीवर वाढविण्याकडे अविवाहित मातांचा वाढता कल दिसत असताना आणि असे कुटुंब हे पूर्णपणे टिकावू ठरू शकत असताना ज्याची इच्छा नाही व ज्याने कधी कदरही केली नाही, असा पिता जबरदस्तीने त्या मुलावर लादून काहीच साध्य होणार नाही.

------------------

सरकारमध्ये राजपत्रित अधिकारी असलेल्या एका अविवाहित ािश्चन मातेच्या अपिलावर न्यायालयाने हा निकाल दिला. या महिलेला आपल्या सर्व बँक खात्यांमध्ये आणि विमा पॉलिसींमध्ये आता पाच वर्षाच्या असलेल्या आपल्या मुलाला ‘नॉमिनी’ करायचे होते. 
परंतु ‘गार्डियनशिप अँड वॉर्ड्स अॅक्ट’नुसार न्यायालयाकडून ‘गार्डियन’ नेमून घेतल्याखेरीज तसे करता येणार नाही, असा तिला सल्ला दिला गेला. त्याप्रमाणो तिने अर्ज केला. पण या मुलाचा पिता कोण, हे उघड करून आणि त्याला रीतसर नोटीस देऊन त्याचे म्हणणो ऐकून घेतल्याशिवाय या अर्जावर सुनावणी करण्यास आधी दिवाणी न्यायालयाने व नंतर उच्च न्यायालयानेही नकार दिला होता. यासाठी संदर्भित कायद्याच्या कलम 11चा आधार घेण्यात आला होता.