शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

बिस्मिल्ला खान यांच्या सनया नातवाने चोरल्या!

By admin | Published: January 11, 2017 4:12 AM

सनईचे जादूगार भारत रत्न बिस्मिल्ला खान यांच्या महिन्यापूर्वी चोरील्या गेलेल्या चार चांदीच्या व एक लाकडी अशा एकूण पाच सनया त्यांच्या नातवानेच चोरल्याचे उघड झाले

वाराणसी : सनईचे जादूगार भारत रत्न बिस्मिल्ला खान यांच्या महिन्यापूर्वी चोरील्या गेलेल्या चार चांदीच्या व एक लाकडी अशा एकूण पाच सनया त्यांच्या नातवानेच चोरल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी या नातवाला आणि त्याच्याकडून या सनया विकत घेणाऱ्या दोन सोनारांना अटक केली आहे.या चोरीचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित पाठक यांनी सांगितले की, बिस्मिल्ला खान यांचा नातू नझरे हसन उर्फ शदाब आणि शंकरलाल शेठ व त्यांचा मुलगा सुजित शेठ या दोन सोनारांना अटक करण्यात आली.पाठक म्हणाले की, नझरे हसन याने चार चांदीच्या सनया चोरल्याची कबुली दिली. या सनया वितळवून तयार केलेला एक किलो चांदीचा गोळाही हस्तगत करण्यात आला. या बदल्यात सोनाराने नझरे हसन यास १७ हजार रुपये दिले होते. बिस्मिल्ला खान यांचा मुलगा काझिम हुसैन यांच्या दालमंडी भागातील घरातून ही चोरी २९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या पाच सनयांखेरीज खानसाहेबांना त्यांच्या चहात्यांनी दिलेली दोन सोन्याची कडी आणि इनायत खान पुरस्काराचे सन्मानचिन्हही चोरीला गेले होते. चार चांदीच्या सनया वगळून चोरीला गेलेल्या अन्य वस्तूंचा शोध घेण्यात येत आहे. चोरून वितळविण्यात आलेल्या या चार चांदीच्या सनया बिस्मिल्ला खान यांना माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आणि मुंबईतील एक रसिक शैलेश भागवत यांनी भेट दिलेल्या होत्या. या सनया मुख्यत्वे शोभेच्या होत्या व उस्ताद त्या कधी कार्यक्रमांत वाजविण्यासाठी नेत नसत. मात्र पाचवी लाकडी सनई त्यांची खास पसंतीची सनई होती. तिला चांदीचा कर्णा होता व मुखाजवळली तिच्यावर चांदीची नक्षीदार पट्टी बसवलेली होती. दरवर्षी बिस्मिल्ला खान मुहर्रमच्या मिरवणुकीत हिच सनई वाजवायचे.ज्या महान कलावंताने सनईसारख्या मंगलवाद्यास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून दिगंत कीर्ति मिळवून दिली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीने त्यांच्या सनया चोरून त्या वितळवून टाकण्याचा नतद्रष्टेपणा करावा, याबद्दल संगीतप्रेमींमध्ये कमालीची चीड व्यक्त करण्यात येत आहे. उस्तादांच्या जन्मशताब्दी वर्षातच हे घडावे याची विशेष बोंच रसिकमनाला लागली आहे. (वृत्तसंस्था)संग्रहालय राहून गेलेबिस्मिल्ला खान हे संपूर्ण देशाचे भूषण असल्याने सरकारने त्यांना मिळालेली सन्मानचिन्हे व त्यांच्याशी संबंधित इतर निवडक वस्तू ताब्यात घेऊन त्यांचे संग्रहालय करावे, अशी मागणी त्यांचे कुटुंबीय गेली १० वर्षे करीत आहेत. या सनया, सोन्याची कडी व इनायत खान सन्मानचिन्ह चोरीला गेल्यानंतर कुटुंबाकडे आता ‘अब्बाजीं’चे भारत रत्न, पद्मश्री व अन्य काही पदके व सन्मानचिन्हे शिल्लक राहिली आहेत.