शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"पंतप्रधान मोदींशी पंगा घेतला तर राजकीय जीवन संपुष्टात येईल"; भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 08:31 IST

BJP Arvind Dharmapuri And K Chandrashekhar Rao : भाजपा खासदार अरविंद धर्मपुरी यांनी केसीआर यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

नवी दिल्ली - तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून निशाणा साधला आहे. यानंतर भाजपा खासदार अरविंद धर्मपुरी (BJP Arvind Dharmapuri) यांनी केसीआर यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. निजामाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार धर्मपुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केसीआर यांनी पंगा घेतला तर त्यांचे राजकीय जीवन संपुष्टात येईल असं म्हटलं आहे. तसेच केसीआर यांच्या राजकीय मृत्यूची वेळ आली आहे असं वादग्रस्त विधान देखील केलं आहे. ते जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. 

अरविंद धर्मपुरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना "जेव्हा गिधाडाचा मृत्यू जवळ येतो तेव्हा तो शहराकडे धावतो. तसेच आता केसीआर यांच्या राजकीय मृत्यूची वेळ आली आहे, म्हणून ते मोदींशी पंगा घेत आहेत आणि केंद्र सरकारशी खोटे बोलत आहेत" असं म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांचा संदर्भ देत धर्मपुरी म्हणाले की "काय पेरणी करावी आणि काय करू नये, हे ना आम्ही कधी शेतकऱ्यांना सुचवले आहे, ना आम्ही शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करणार नाही, असे कधी सांगितले नाही. केसीआर जनतेची दिशाभूल करत आहेत." यासोबतच पुरस्कारासाठी राज्यातील लोकांची मुख्यमंत्र्यांनी शिफारस का केली नाही" असा सवाल धर्मपुरी यांनी केला आहे. 

मोदी सरकारवर तेलंगणातील लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सोमवारी मोदी सरकारवर तेलंगणातील लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. मोदी सरकार आपल्या राज्यातील जनतेला जाणीवपूर्वक पुरस्कार देत नाही असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. "जीभ कापून टाकू" असं म्हणत थेट भाजपा नेत्यांना इशारा दिला आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राज्यातील शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याचे आश्वासन फसवे असल्याचं म्हटलं. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना आमच्याबद्दल अनावश्यक गोष्टी बोलणं टाळा नाहीतर जीभ कापून टाकू असा इशाराही दिला. केसीआर यांनी केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुसरे पीक निवडण्यास सांगितले आहे असं म्हटलं आहे.

"...तर जीभ कापून टाकू"; तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भाजपा नेत्यांना इशारा

"तुम्ही आमच्याबद्दल उद्धटपणे बोललात तर आम्ही तुमच्या (राज्यातील भाजपा नेत्यांच्या) जीभ कापून टाकू" असं म्हटलं आहे. "संजय म्हणाले होते की ते मला तुरुंगात पाठवणार आहेत. मी त्यांना मला स्पर्श करण्याचे आव्हान देतो. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना केसीआर म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहोत. "शेती कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. शेतकऱ्यांना वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. विरोधक राजकारण करुन शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळत आहेत. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) शेतकर्‍यांच्या हक्कासाठी केंद्राविरोधात आंदोलन करणार आहे" असंही के चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTelanganaतेलंगणाPoliticsराजकारण