शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहात पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
4
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
6
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
7
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
8
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
9
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
10
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
11
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
12
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
13
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
14
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
15
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
16
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
17
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
18
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
19
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
20
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?

गुरमेहर कौर प्रकरणी भाजपा बॅकफूटवर

By admin | Published: March 02, 2017 10:29 AM

दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी गुरमेहर कौर प्रकरणी सुरु असलेल्या वादात भाजपाने नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी गुरमेहर कौर प्रकरणी सुरु असलेल्या वादात भाजपाने नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. बुधवारचा घटनाक्रम पाहता भाजपाने बॅकफूटवर जाण्याचा निर्णय घेतल्याचं लक्षात येत आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी खासगीत बोलताना गुरमेहर कौरला एकटी सोडलं पाहिजे असं मान्य केलं आहे. या संपुर्ण प्रकरणाला चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आलं असं पक्षाला वाटत आहेत.
 
(ABVP च्या दोन सदस्यांचं निलंबन, सेहवागकडूनही खुलासा)
(गुरमेहरच्या समर्थकांना देशाबाहेर हाकलून द्या - भाजपा मंत्री)
(असहिष्णू गँगचे पुनरागमन - अनुपम खेर)
 
गुरमेहर कौरवर निशाणा साधणारा क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि अभिनेता अनुपम खेरदेखील बॅकफूटवर जाताना दिसले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनातून माघार घेत पुन्हा जालंधरला जाण्याचा निर्णय गुरमेहरने घेतल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी समर्थनार्थ उतरले होते. याआधी गुरमेहर कौरला ऑनलाइन ट्रोल केलं जात असताना बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 
 
(सेहवाग भारताचा नाही तर BCCI चा प्रतिनिधी - उमर खालिद)
(देशभक्ती पुस्तकातून येत नाही - जावेद अख्तर यांना बबिता फोगाटचे प्रत्युत्तर)
(हाच तो व्हिडीओ ज्यामुळे गुरमेहर कौरवर होतेय टीका)
 
केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीदेखील बुधवारी बोलताना 'शहीदाच्या मुलीला आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क असून तिला ट्रोल करणं चूक असल्याचं', सांगितलं. रवीशंकर प्रसाद यांच्या या वक्तव्यामुळे भाजपा कॅम्पमध्ये वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज लावला जाऊ शकतो. 'प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण काश्मीर स्वतंत्र झाला पाहिजे असं म्हणणं चुकीचं आहे', असंही रवीशंकर बोलले आहेत.
 
दुसरीकडे याच मुद्द्यावर ट्विट करुन वादात भर घालणारे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील आपली भूमिका बदलली आहे. 26 फेब्रुवारी रोजी ट्विट कर त्यांनी विचारलं होतं की, 'माहित नाही या मुलीचं डोकं कोण प्रदुषित रत आहे ?'. गुरमेहरला मिळालेल्या धमकींबाबत विचारलं असता आपल्याला याबद्दल माहित नसल्याचं ते बोलले होते. 'मी प्रचारसभांमुळे मणिपूरमध्ये व्यस्त होतो, मला सर्व गोष्टींची माहिती नाही. मी त्या मुलीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो', असं किरेन रिजिजू बोलले.
 
विरेंद्र सेहवागनेही ट्विट करत, 'प्रत्येकाला न घाबरता आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे. मग ती गुरमेहर कौर असो किंवा फोगट भगिनी', सांगितलं आहे. अनुपम खेर यांनीदेखील गुरमेहरची बाजू योग्य असल्याचं सांगितलं. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी सांगितलं की, 'युद्ध होऊ नये असं तिचं म्हणणं योग्य आहे. सीमेवर तैनात सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी असून गोळी खाण्यासाठी नाही'. क्रिकेटर गौतम गंभीर आणि विद्या बालन यांनीही गुरमेहरचं समर्थन केलं आहे. 
 
संपुर्ण वादानंतर एबीव्हीपीनेदेखील डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. कॅम्पस परिसरात झालेल्या हिंसाचारात तसंच राजकीय नेते आणि सेलिब्रेटींच्या शाब्दिक चकमकीत सहभागी झालेल्या दोन सदस्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निलंबित केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांवर हल्ला केल्याप्रकरणी यांना अटक करण्यात आली होती. बेशिस्तपणाचा ठप्पा ठेवत त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास सक्त कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.