शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ब्लॅक लिस्टमधील अगुस्ता वेस्टलँडला मेक इन इंडियात का घुसडलं, काँग्रेसचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 17:42 IST

अगुस्ता वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

नवी दिल्ली- अगुस्ता वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. काल केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. चोराच्या उलट्या बोंबा, असं जावडेकर काँग्रेसला उद्देशून बोलले होते. त्यानंतर आज काँग्रेसनंही भाजपावर निशाणा साधला आहे. सरकारनं अगुस्ता वेस्टलँड या कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर का काढलं, मोदी सरकार अगुस्ता वेस्टलँड हा कंपनीचे हितचिंतक आहेत काय, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे. मोदी सरकारनं अगुस्ता वेस्टलँड या कंपनीला काळ्या यादीतून हटवून मेक इन इंडियाचा एका भाग बनवलं.मोदी सरकारनं स्वतःची कपटी रणनीती लपवण्यासाठीच मोदी बचावचा नारा दिला आहे. अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात 12 फेब्रुवारी 2013 रोजी काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारनं चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. आता हाच मुद्दा घेऊन काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार अगुस्ता वेस्टलँड कंपनीचे हितचिंतक आहेत, मोदी सरकारनं 100 नौसैनिक हेलिकॉप्टरसाठी बोली लावण्यास अगुस्ता वेस्टलँडसारख्या ब्लॅकलिस्टेड कंपनीला परवानगी कशी दिली ?, असा प्रश्नही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. 27 फेब्रुवारी 2013मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी जेपीसीच्या चौकशीचे आदेश दिले होते. परंतु भाजपानं त्याकडे दुर्लक्ष केलं. मोदी सरकार यांनी अगुस्ता वेस्टलँड आणि त्यांचं स्वामित्व असलेली फिनमेकॅनिका कंपनीला ब्लॅकलिस्टमधून का हटवलं, असा प्रश्नही काँग्रेसनं उपस्थित केला आहे.

टॅग्स :Agusta Westland Scamऑगस्टा वेस्टलँड घोटाळाcongressकाँग्रेस