शहरं
Join us  
Trending Stories
1
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
2
'एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा...' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना प्रश्न
3
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
4
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
5
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
6
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
7
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
8
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
9
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
10
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
12
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
13
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
14
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
15
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
16
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
17
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
18
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
19
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
20
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

भाजपाला तोपर्यंत हरवू शकत नाही जोवर...; प्रशांत किशोरांचा विरोधी पक्षांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 12:18 PM

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०१४ मध्ये भाजपाचं काम केले होते. नरेंद्र मोदींच्या प्रचारात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

नवी दिल्ली - २०२४ च्या निवडणुकीत भाजपाविरोधात विरोधी पक्षांची एकजूट कधी काम करणार नाही कारण ही एकजूट अस्थिर आणि वैचारिकपणे वेगळी असेल असं विधान निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले आहे. विरोधी पक्षांची एकजूट हा केवळ दिखाऊपणा आहे आणि पक्ष, नेते एकमेकांसोबत आल्याने हे शक्य होणार नाही असं म्हणत प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या फायद्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

प्रशांत किशोर म्हणाले की, जर तुम्हाला भाजपाला आव्हान द्यायचे असेल तर तुम्हाला भाजपाची ताकद हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकासवाद हे समजून घ्यायला हवं. हे त्रिस्तरीय स्तंभ आहेत. ज्यांना भाजपाला आव्हान द्यायचे आहे त्यांना या तीनपैंकी २ गोष्टींवर सुधारणा करायला हवी. हिंदुत्व विचारधारेशी लढण्यासाठी विविध विचारधारांची आघाडी व्हायला हवी. गांधीवादी, आंबेडकरवादी, समाजवादी आणि डावे यांची विचारधारा खूप महत्त्वाची आहे, पण विचारधारेच्या नावाखाली तुम्ही अंधश्रद्धा करू शकत नाही असा सल्ला किशोर यांनी दिला. 

तसेच 'मीडियातील लोक विरोधी आघाडीकडे पक्ष किंवा नेत्यांचे एकत्र येणे म्हणून पाहत आहेत. कोण कोणासोबत जेवतोय, कोणाला चहाला बोलावलंय…पण हे मी विचारधारेच्या आधारे पाहत आहे. वैचारिक युती झाल्याशिवाय भाजपला पराभूत करण्याचा मार्ग नाही. माझी विचारधारा महात्मा गांधींची विचारधारा आहे. बिहारमध्ये जन सुराज यात्रा गांधींच्या काँग्रेसची विचारधारा पुनर्जीवित करण्याचा एक प्रयत्न आहे असंही प्रशांत किशोर यांनी सांगितले. 

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०१४ मध्ये भाजपाचं काम केले होते. नरेंद्र मोदींच्या प्रचारात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. या निवडणुकीपासून ते पुढे आले. प्रशांत किशोर आता 'जन सुराज यात्रे'साठी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. राज्य समजून घेऊन नवी राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा हा केवळ प्रयत्न असल्याचे किशोर यांचे म्हणणे आहे. राजकीय वर्तुळात 'पीके' म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर हे देशात निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. बिहार हे जातीपातीच्या राजकारणासाठी आणि अनेक चुकीच्या कारणांसाठी ओळखले जाते. लोक काय करण्यास सक्षम आहेत यासाठी बिहार ओळखण्याची वेळ आली आहे असं किशोर यांनी म्हटलं.  

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस