शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

भाजपाला तोपर्यंत हरवू शकत नाही जोवर...; प्रशांत किशोरांचा विरोधी पक्षांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 12:19 IST

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०१४ मध्ये भाजपाचं काम केले होते. नरेंद्र मोदींच्या प्रचारात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

नवी दिल्ली - २०२४ च्या निवडणुकीत भाजपाविरोधात विरोधी पक्षांची एकजूट कधी काम करणार नाही कारण ही एकजूट अस्थिर आणि वैचारिकपणे वेगळी असेल असं विधान निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले आहे. विरोधी पक्षांची एकजूट हा केवळ दिखाऊपणा आहे आणि पक्ष, नेते एकमेकांसोबत आल्याने हे शक्य होणार नाही असं म्हणत प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या फायद्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

प्रशांत किशोर म्हणाले की, जर तुम्हाला भाजपाला आव्हान द्यायचे असेल तर तुम्हाला भाजपाची ताकद हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकासवाद हे समजून घ्यायला हवं. हे त्रिस्तरीय स्तंभ आहेत. ज्यांना भाजपाला आव्हान द्यायचे आहे त्यांना या तीनपैंकी २ गोष्टींवर सुधारणा करायला हवी. हिंदुत्व विचारधारेशी लढण्यासाठी विविध विचारधारांची आघाडी व्हायला हवी. गांधीवादी, आंबेडकरवादी, समाजवादी आणि डावे यांची विचारधारा खूप महत्त्वाची आहे, पण विचारधारेच्या नावाखाली तुम्ही अंधश्रद्धा करू शकत नाही असा सल्ला किशोर यांनी दिला. 

तसेच 'मीडियातील लोक विरोधी आघाडीकडे पक्ष किंवा नेत्यांचे एकत्र येणे म्हणून पाहत आहेत. कोण कोणासोबत जेवतोय, कोणाला चहाला बोलावलंय…पण हे मी विचारधारेच्या आधारे पाहत आहे. वैचारिक युती झाल्याशिवाय भाजपला पराभूत करण्याचा मार्ग नाही. माझी विचारधारा महात्मा गांधींची विचारधारा आहे. बिहारमध्ये जन सुराज यात्रा गांधींच्या काँग्रेसची विचारधारा पुनर्जीवित करण्याचा एक प्रयत्न आहे असंही प्रशांत किशोर यांनी सांगितले. 

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०१४ मध्ये भाजपाचं काम केले होते. नरेंद्र मोदींच्या प्रचारात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. या निवडणुकीपासून ते पुढे आले. प्रशांत किशोर आता 'जन सुराज यात्रे'साठी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. राज्य समजून घेऊन नवी राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा हा केवळ प्रयत्न असल्याचे किशोर यांचे म्हणणे आहे. राजकीय वर्तुळात 'पीके' म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर हे देशात निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. बिहार हे जातीपातीच्या राजकारणासाठी आणि अनेक चुकीच्या कारणांसाठी ओळखले जाते. लोक काय करण्यास सक्षम आहेत यासाठी बिहार ओळखण्याची वेळ आली आहे असं किशोर यांनी म्हटलं.  

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस