शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आसाममध्ये कोणाला मुख्यमंत्री करायचे, यावरून भाजप संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 06:32 IST

सोनोवाल की हिमंत बिस्वा सर्मा?

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळविल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोणाला करायचे, या मुद्द्यावरून भाजप द्विधा मन:स्थितीत आहे. त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सर्वनंद सोनोवाल यांना बाजूला सारून हिमंत बिस्वा सर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात येईल अशी चर्चा होती; पण सोनोवाल यांना दुखावले तर आसाममध्ये भाजपला ते महागात पडू शकते, अशी चिन्हे दिसत आहेत.

आसाममधील निवडणुकांनंतर भावी मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर भाजपने प्रचारादरम्यानही कधीच दिले नाही. हिमंत बिस्वा सर्मा यांच्या गटाच्या दबावामुळे असे प्रश्न भाजप नेहमीच टाळत आला आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत आसाममध्ये एनडीएला मिळालेली मते व जिंकलेल्या जागांचे प्रमाण २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांतील प्रमाणापेक्षा कमी आहे. तसेच २०१६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतील कामगिरीही फार नेत्रदीपक नाही. २०१६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत ईशान्य भारतामध्ये सर्वनंद सोनोवाल हे भाजपचे अत्यंत लोकप्रिय नेते होते. तर हिमंत बिस्वा सर्मा हे भाजपचे स्टार प्रचारक व नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक आघाडीचे निमंत्रक होते. सर्वनंद सोनोवाल यांचे महत्त्व कमी करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय असलेल्या हिमंत बिस्वा सर्मा यांना भाजपने विधानसभा निवडणुकांत झुकते माप दिल्याने भाजपचा फार फायदा झालेला नाही, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.सोनोवाल व हिमंत बिस्वा सर्मा या दोन नेत्यांनी आसाममध्ये भाजपचा जनाधार वाढविला आहे, पक्षाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. 

या आठवड्यात देणार अहवालआसाममध्ये आता हिमंत बिस्वा सर्मा यांना उपमुख्यमंत्री करावे व  कालांतराने मुख्यमंत्रिपदी वर्णी लावावी असाही भाजप विचार करत आहे. आसामच्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसंदर्भात भाजपचे केंद्रीय निरीक्षक आपला अहवाल पक्षाच्या संसदीय मंडळासमोर ठेवतील.

टॅग्स :AssamआसामElectionनिवडणूकChief Ministerमुख्यमंत्री